शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

‘त्या’ भूखंडांकडे वर्षभरापासून दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:25 IST

महापालिका : शहरात कराराने दिलेले १५४ तर पडीक ५८३ भूखंड

ठळक मुद्देकरारनामे तपासून कार्यवाही आवश्यक...शहरात कराराने दिलेले १५४ तर पडीक ५८३ भूखंड

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात नगरपालिका व महानगरपालिकेने नाममात्र शुल्काने करार तत्त्वावर दिलेले १५४ भूखंड व पडीक असलेल्या ५८४ भूखंडांकडे मनपाने वर्षभरापासून दुर्लक्ष केले आहे़ सदर भूखंडांचे सर्वेक्षण करून ते ताब्यात घेण्याचे आदेश मनपाच्या तत्कालीन आयुक्तांनी दिले, मात्र त्याबाबत कार्यवाही होऊ शकलेली नाही़शहरातील अनेक भूखंड केवळ स्थायी समितीत ठराव करून तीस वर्षांच्या कराराने धुळे नगरपालिकेतर्फे देण्यात आले होते़ सामाजिक, शैक्षणिक संस्थांसह व्यवसायासाठी देखील हे भूखंड देण्यात आले, मात्र करार संपून कितीतरी वर्षे उलटूनही मनपाने या भूखंडांकडे लक्ष दिलेले नाही, शिवाय ते ताब्यातही घेतले नाही़ परिणामी, कराराने दिलेल्या बहुतांश भूखंडांवर इमारतींसह विविध प्रकारचे बांधकाम झाले आहे़ काही ठिकाणी गाळे बांधून त्यांचा व्यावसायिक वापर सुरू आहे़ नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतरही परिस्थिती बदलली नाही़ दरम्यान, मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी सर्व भूखंडांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार सर्वेक्षण केल्यानंतर मनपाचे १५४ भूखंड स्थायी समितीने ठराव करून कराराने दिल्याचे दिसून समोर आले़ सदरचे भूखंड १९८५ ते २०१५ या कालावधीत करार तत्त्वावर देण्यात आले आहेत़ परंतु आयुक्तांनी थेट १९०० पासून देण्यात आलेल्या जागांचे ‘रेकॉर्ड’ तपासण्याचे आदेशही दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही़ सर्वेक्षणात १५४ कराराने दिलेले भूखंड व ५८४ लहान-मोठे पडीक भूखंड असल्याचे समोर आले आहेत़ दरम्यान, पडीक भूखंडांवर मनपाने नाव लावण्यासाठी तहसीलदारांना पत्र दिले होते, परंतु त्यानंतर त्याबाबत पाठपुरावा करण्यात आला नाही़ सदर सर्वेक्षणानंतर महापालिकेने इस्टेट मॅनेजरची नेमणूक करून त्यांच्यामार्फत कराराने ज्यांना भूखंड देण्यात आले आहे, त्या भूखंडधारकांना नोटिसा बजावून मनपाचा भूखंड ३० दिवसांत कराराने देताना ज्या स्थितीत होता त्या स्थितीत परत करावा, असे आदेशित केले़ मात्र, या नोटिसांना भूखंडधारकांनी प्रतिसाद दिला नाही़ त्यानंतर भूखंडांबाबत कोणतीही हालचाल मनपाने केलेली नाही़ काही भूखंडधारकांनी भूखंडांवर स्वत:चे नावही लावून घेतले आहे़ तरीदेखील महापालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही़ त्यामुळे उत्पन्न वाढीच्या पर्यायांचा शोध घेण्यासाठी तासन्तास बैठका होत असल्या, तरी अन्य महत्त्वपूर्ण पर्यायांकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे़ महापालिका प्रशासनच नव्हे, तर पदाधिकाºयांनाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे़ .

शहरातील एका शैक्षणिक संस्थेला देण्यात आलेली जागा चक्क एक रुपया वार्षिक भाड्याने देण्यात आल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले होते़ अनेक जागांचे करार संपून कितीतरी वर्ष लोटल्याने या जागा सर्व करारनामे व कागदपत्रे तपासून ताब्यात घेणे गरजेचे आहे़ ज्या जागांचे करार यापूर्वीच संपले असतील, त्या ताब्यात घेणे आवश्यक आहे़ ज्या जागांच्या करारांची मुदत अजून शिल्लक असेल, त्यांना रेडिरेकनरनुसार भाडेआकारणी होणे आवश्यक आहे़