शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ भूखंडांकडे वर्षभरापासून दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:25 IST

महापालिका : शहरात कराराने दिलेले १५४ तर पडीक ५८३ भूखंड

ठळक मुद्देकरारनामे तपासून कार्यवाही आवश्यक...शहरात कराराने दिलेले १५४ तर पडीक ५८३ भूखंड

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात नगरपालिका व महानगरपालिकेने नाममात्र शुल्काने करार तत्त्वावर दिलेले १५४ भूखंड व पडीक असलेल्या ५८४ भूखंडांकडे मनपाने वर्षभरापासून दुर्लक्ष केले आहे़ सदर भूखंडांचे सर्वेक्षण करून ते ताब्यात घेण्याचे आदेश मनपाच्या तत्कालीन आयुक्तांनी दिले, मात्र त्याबाबत कार्यवाही होऊ शकलेली नाही़शहरातील अनेक भूखंड केवळ स्थायी समितीत ठराव करून तीस वर्षांच्या कराराने धुळे नगरपालिकेतर्फे देण्यात आले होते़ सामाजिक, शैक्षणिक संस्थांसह व्यवसायासाठी देखील हे भूखंड देण्यात आले, मात्र करार संपून कितीतरी वर्षे उलटूनही मनपाने या भूखंडांकडे लक्ष दिलेले नाही, शिवाय ते ताब्यातही घेतले नाही़ परिणामी, कराराने दिलेल्या बहुतांश भूखंडांवर इमारतींसह विविध प्रकारचे बांधकाम झाले आहे़ काही ठिकाणी गाळे बांधून त्यांचा व्यावसायिक वापर सुरू आहे़ नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतरही परिस्थिती बदलली नाही़ दरम्यान, मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी सर्व भूखंडांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार सर्वेक्षण केल्यानंतर मनपाचे १५४ भूखंड स्थायी समितीने ठराव करून कराराने दिल्याचे दिसून समोर आले़ सदरचे भूखंड १९८५ ते २०१५ या कालावधीत करार तत्त्वावर देण्यात आले आहेत़ परंतु आयुक्तांनी थेट १९०० पासून देण्यात आलेल्या जागांचे ‘रेकॉर्ड’ तपासण्याचे आदेशही दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही़ सर्वेक्षणात १५४ कराराने दिलेले भूखंड व ५८४ लहान-मोठे पडीक भूखंड असल्याचे समोर आले आहेत़ दरम्यान, पडीक भूखंडांवर मनपाने नाव लावण्यासाठी तहसीलदारांना पत्र दिले होते, परंतु त्यानंतर त्याबाबत पाठपुरावा करण्यात आला नाही़ सदर सर्वेक्षणानंतर महापालिकेने इस्टेट मॅनेजरची नेमणूक करून त्यांच्यामार्फत कराराने ज्यांना भूखंड देण्यात आले आहे, त्या भूखंडधारकांना नोटिसा बजावून मनपाचा भूखंड ३० दिवसांत कराराने देताना ज्या स्थितीत होता त्या स्थितीत परत करावा, असे आदेशित केले़ मात्र, या नोटिसांना भूखंडधारकांनी प्रतिसाद दिला नाही़ त्यानंतर भूखंडांबाबत कोणतीही हालचाल मनपाने केलेली नाही़ काही भूखंडधारकांनी भूखंडांवर स्वत:चे नावही लावून घेतले आहे़ तरीदेखील महापालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही़ त्यामुळे उत्पन्न वाढीच्या पर्यायांचा शोध घेण्यासाठी तासन्तास बैठका होत असल्या, तरी अन्य महत्त्वपूर्ण पर्यायांकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे़ महापालिका प्रशासनच नव्हे, तर पदाधिकाºयांनाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे़ .

शहरातील एका शैक्षणिक संस्थेला देण्यात आलेली जागा चक्क एक रुपया वार्षिक भाड्याने देण्यात आल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले होते़ अनेक जागांचे करार संपून कितीतरी वर्ष लोटल्याने या जागा सर्व करारनामे व कागदपत्रे तपासून ताब्यात घेणे गरजेचे आहे़ ज्या जागांचे करार यापूर्वीच संपले असतील, त्या ताब्यात घेणे आवश्यक आहे़ ज्या जागांच्या करारांची मुदत अजून शिल्लक असेल, त्यांना रेडिरेकनरनुसार भाडेआकारणी होणे आवश्यक आहे़