शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सासुने माघार घेतल्याने सूनबाई बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 22:20 IST

पळासनेर गट : भाजपच्या मोगराबाई पाडवी बिनविरोध, आता फक्त १२ गटांसाठीच होणार निवडणूक

शिरपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच वाघाडी गटापाठोपाठ पळासनेर गटातील भाजपच्या उमेदवार बिनविरोध झालेल्या आहेत. पळासनेर गटातून सासू तारकीबाई पावरा यांनी माघार घेतल्याने सून मोगराबाई जयवंत पाडवी या भाजपच्या उमेदवार बिनविरोध झालेल्या आहे. या निवडीची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.पळासनेर गटात मोगराबाई जयवंत पाडवी (भाजपा), मेदांबाई मंगेश पावरा (राष्ट्रवादी), तारकीबाई प्रताप पावरा (अपक्ष) अशा तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र मेंदाबाई पावरा यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन पक्षांचे एबी फॉर्म जोडल्यामुळे त्यांचा अर्ज छाननीत बाद करण्यात आला होता़ त्यामुळे सासू तारकीबाई पावरा व सुन मोगराबाई पावरा असे दोघांचेच अर्ज शिल्लक राहिले होते़ २६ डिसेंबर रोजी तारकीबाई पावरा यांनी माघार घेतल्यामुळे त्यांची सून भाजपच्या उमेदवार मोगराबाई पाडवी या बिनविरोध झाल्यात़ त्या ‘शिसाका’चे संचालक जयवंत पाडवी यांच्या पत्नी आहेत़ दरम्यान वाघाडी गट पाठोपाठ पळासनेर गटही बिनविरोध झालेला आहे. आता तालुक्यातील १४ पैकी दोन गट बिनविरोध झाल्याने आता १२ गटासाठीच निवडणूक होणार आहे. त्यातही ३० तारखेपर्यंत अजून काही गट बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.भाजपने सर्व जागांवरदिले उमेदवारशिरपूर तालुक्यात १४ जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होत आहे़ १४ गटापैकी १० गट आरक्षित असल्यामुळे केवळ विखरण बु़ वनावल, शिंगावे व भाटपुरा असे चारच गट खुले प्रवर्गासाठी आरक्षित आहेत़ त्यातही वनावल हा गट महिला जागेसाठी आरक्षित आहे़आमदारद्वयीं विधानसभेच्या निवडणूक पूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात दाखल झाले होते़ त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात प्रथमच भाजपाचे कमळ फुलले़ होवू घातलेल्या जि़प़ निवडणूकीत सुध्दा यापूर्वी बोटावर मोजण्या एवढ्या जागा पटकाविणाऱ्या भाजपला आता चांगले दिवस आले आहेत़ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने सर्वच्या सर्व म्हणजेच १४ जागांवर उमेदवार दिले होते. त्यातही वाघाडी व पळासनेर गट बिनविरोध करून तालुक्यात भाजपने विजयी सलामी दिलेली आहे.आता भाजपचे १२, राष्टÑवादी कॉँग्रेसचे सहा, काँग्रेस, शिवसेना, भाकप यांचे प्रत्येकी तीन-तीन तर महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या तालुक्यात महाविकास आघाडी झालेली नाही. त्यामुळे काँग्रेसने वेगळीच चुल मांडून केवळ तीन जागांवरच उमेदवार दिलेले आहेत़ तर राष्ट्रवादी व शिवसेना या दोघांनी मिळवून ९ जागांवर उमेदवार दिले आहेत़ अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.तर रोहिणी गटही बिनविरोध होऊ शकतोरोहिणी गटात कैलास हारसिंग पावरा (भाजप), प्रताप ढेडा पावरा (राष्ट्रवादी), कैलास दुरसिंग पावरा (अपक्ष) या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल होते़ मात्र छाननीत राष्ट्रवादीचे उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे कदाचित माघारीच्या दिवशी अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास हा गट देखील बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तसे झाल्यास प्रथमच वाघाडी, पळासनेर व रोहिणी असे ३ गट बिनविरोध होतील़आता १२ गटासाठीच निवडणूक होणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे