शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

साठवून ठेवलेला कांदा सडू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:42 IST

गतवर्षाप्रमाणे यंदाही पौर्णिमेनंतर बाजारभाव निश्चित वाढतील. या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. गतवर्षी चाळीत साठविलेल्या उन्हाळी कांद्याला विक्रमी ...

गतवर्षाप्रमाणे यंदाही पौर्णिमेनंतर बाजारभाव निश्चित वाढतील. या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. गतवर्षी चाळीत साठविलेल्या उन्हाळी कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळाल्यामुळे चालू वर्षी देखील कांद्याला चांगला दर मिळेल म्हणून मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. परंतु कांद्याच्या बाजारभावातील अस्थिरतेमुळे चाळीतील उन्हाळी कांदा विकण्यासंदर्भात शेतकरी संभ्रमात आहेत. अनेक शेतकऱ्यांना कांदा विक्री करण्यासंदर्भात निश्चित निर्णय घेता येत नाही. त्यातच मोठ्या अपेक्षेने चाळीत साठवणूक केलेला कांदा सडू लागला असून, काही शेतकऱ्यांचे चाळीतील कांदा संपूर्ण सडल्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सहा ते सात महिने चाळीत टिकणारा कांद्याला चालू वर्षी वातावरणात होणाऱ्या बदलांचा चांगलाच फटका बसला आहे. कांदा सडू लागल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता नाइलाजाने चाळीत साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीकरिता जात असल्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढू लागली आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पोळ कांद्याचे बियाणे शेतात टाकले होते. वातावरणात अचानक होणारे बदल व नुकत्याच झालेल्या रिमझिम पावसामुळे रोपे खराब झाली असून, या शेतकऱ्यांना पुन्हा महागडे बियाणे उपलब्ध करावे लागणार आहे.

*प्रतिक्रिया*

महिनाभरातच कांदा सडू लागल्याच्या तक्रारी

दरवर्षी डिसेंबरपर्यंत चाळीत टिकणारा कांदा चालू वर्षी चाळीत टाकल्यानंतर महिनाभरातच सडू लागल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. परंतु कांद्याचे दर वाढण्याच्या अपेक्षेने शेतकरी होणारे नुकसान सहन करीत होते. परंतु वातावरणातील बदलामुळे कांदे सडण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली व संपूर्ण नुकसान होण्यापेक्षा शाबूत असलेला कांदा विकून मिळेल ते पदरात पाडून घेण्याचा दृष्टिकोन ठेवत शेतकयांनी चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी आणण्यास प्रारंभ केला आहे.

समाधान ढिवरे , शेतकरी , ऐचाळे

2) उन्हाळी कांदा बियाणांत झालेली फसवणूक, सर्वत्र तुटवडा असल्यामुळे नाईलाजाने अव्याच्या सव्वा किमत मोजून खरेदी केलेले नित्कृष्ट काटा बिर कांद्याची रोपे खराब झाले. अवकाळी पावसामुळे कांद्याच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला.

सरदार खटा पाटील , शेतकरी ,बळसाणे