शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट ; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST

धुळे : अनलॅाक झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्ववत सुरू झाली. सुरूवातीला केवळ महानगरांमध्येच जाणारी बस आता ग्रामीण भागातही ...

धुळे : अनलॅाक झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्ववत सुरू झाली. सुरूवातीला केवळ महानगरांमध्येच जाणारी बस आता ग्रामीण भागातही जाऊ लागलेली आहे. मात्र अनेक गावांमध्ये अद्यापही मुक्कामी बसगाड्या सुरू न झाल्याने, ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. मुक्कामी बस कधी सुरू होणार असा प्रवाशांचा प्रश्न आहे.

एसटीची सेवा अविरत सुरू असते. मात्र कोरोनामुळे दोन वर्षात दोनवेळा एसटी काही महिने बंद होती. मात्र त्यानंतरही एसटी प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली. अनलॅाकनंतर उत्पन्न वाढीसाठी सुरवातीला फक्त लांबपल्याच्या गाड्याच सुरू करण्यात आल्या. त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्यात आल्या. मात्र अजुनही अनेक आगारांनी मुक्कामी बसेस सुरू केलेल्या नाही.

ग्रामीणमध्ये जाणाऱ्या बसेसला प्रतिसाद

एसटी बंद असल्याने, अनेकजण खासगी वाहनांनीच प्रवास करीत होते. मात्र खासगी वाहनांचे भाडे जास्त होते. काहींनी तर प्रवाशांची गरज ओळखून जास्त पैसे वसूल केले. मात्र ज्या मार्गावर गर्दी आहे, ज्या ग्रामीण मार्गावर गर्दी आहे, त्या मार्गावर बसेस सुरू केल्या. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल

एकीकडे ग्रामीण भागात मुक्कामी बस नसतांना शहरी भागात जाण्यासाठी महामंडळातर्फे जादा गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत. त्याचा फायदा प्रवाशांना होतो.

धुळे आगारातून नाशिक, पुणे, औरंगाबाद, जळगाव, चोपडा, या भागासाठी ठराविक कालावधीनंतर बसेसस सोडण्यात येतात. या सर्व गाड्या फुल्ल असतात. याशिवाय इतर आगाराच्याही लांबपल्याच्या गाड्या येथे येतात. त्याद्वारेही प्रवासी प्रवास करीत असतात.

ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटीचाच आधार असतो. सकाळी जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या ठिकाणी जायाचे असल्यास खाजगी वाहन उपलब्ध नसते. त्यामुळे मुक्कामी असलेल्या बसचाच फायदा होत असतो. मात्र मुक्कामी बस असल्याने, पुढील नियोजन कोलमडते.

- एस.डी. वाघ,

प्रवासी

एसटीची सेवा पूर्ववत सुरू झालेली असतांना, ग्रामीण भागातच मुक्कामी बस का सुरू केली जात नाही, हा एक प्रश्नच आहे. वास्तविक ग्रामीण भागात सर्वात जास्त गर्दी ही पहिल्या बसलाच होत असते. त्यातून महामंडळाला उत्पन्न मिळते. त्यामुळे ग्रामीणच्या मुक्कामी बसेस सुरू कराव्यात.

- समाधान पाटील,

प्रवासी.

मुक्कामी जाणाऱ्या गाड्यांचे काय?

धुळे आगारातूनही अनेक गावांसाठी मुक्कामी बसेस सुरू करण्यात आलेल्या होत्या. अनलॅाकनंतर यापैकी बहुतेक गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र अजुनही काह गावांमध्ये मुक्कामी बसेस सुरू झालेल्या नाहीत. या कधी सुरू होतील याचेही उत्तर मिळत नाही.

शाळा बंद असल्याने मुक्कामी गाड्या बंद

ग्रामीण भागात ॲानलाईन-ॲाफलाइन शिक्षण सुरू झालेले असले तरी शहरी भागात अजुनही शाळा, महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्यांची गर्दी जास्त असते. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने अजुनही ग्रामीणमधील मुक्कामी बसेस बंद असल्याचे एस.टी. कार्यालयातून सांगण्यात आले.