शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

राज्यात शिरपूर न.पा. ६व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 19:34 IST

स्वच्छ सर्वेक्षण अभियान : देशात ४२व्या क्रमांकावर मिळविले स्थान

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : देशातील २ हजार शहरांचा समावेश असलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२० चा निकाल जाहिर करण्यात आला आहे. त्यात शिरपूर- वरवाडे नगरपरिषद देशातून ४२व्या स्थानावर तर राज्यातील पश्चिम झोनमध्ये ६ व्या स्थानावर आहे़ गेल्यावर्षी ही नगरपालिका देशात ४९ व्या स्थानी होती़ स्वच्छ सर्वेक्षणाबाबत राज्य आणि केंद्रीय समितीने डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० मध्ये पहाणी केली होती़ त्यानंतर हा निकाल नुकताच घोषित करण्यात आला़केंद्रसरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियांतर्गत देशातील १ लाख लोकसंख्येतील २ हजार शहरात शिरपूर शहराचा देखील समावेश असून या अभियानाची शिरपूर नगरपालिकेत अंमलबजावणी करण्यात येत आहे़ मागीलवर्षी शिरपूर नगरपालिका ४९ व्या स्थानी होती़ त्यानंतर नगरपालिकेने स्वच्छतेबाबत ओला-सुका कचरा वर्गीकरणावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे यंदा ४२व्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे़स्वच्छ सर्वेक्षणाबाबत राज्य आणि केंद्रीय समितीने डिसेंबर २०१९ आणि जानेवारी २०२० मध्ये पहाणी केली होती़ यावेळी समितीने वेगवेगळ्या प्रभागात भेटी देवून पहाणी केली होती़ तसेच नागरिकांचा अभिप्राय, ओला-सुका कचरा वर्गीकरण, प्लॅस्टिक बंदी, घरोघर कचरा संकलन, कागदपत्रांची पूर्तता आणि घनकचरा प्रक्रिया प्रकल्प असे निकष असून समितीने तपासणी केली होती़देशातील पहिले स्वच्छता मंदिर या पालिकेने उभारले आहे़ विशेषत: या शहरात होम कंपोस्टींगमध्ये शहरवासियांचा अधिक सहभाग, १२ घंट्यागाड्याद्वारे कचरा संकलन केला जातो़ २४ तासाच्या आत तक्रारींचे निवारण केले जाते़ जनजागृती अभियानात स्मार्ट गृहिणी स्पर्धा घेण्यात आली होती़ विशेषत: शहरात १०० टक्के प्लॅस्टीक बंदी घालण्यात आली आहे़ त्यानुसार नगरपालिकेने देशात ४२ वे तर राज्यात ६ वे स्थान पटकावले आहे़ गेल्या वर्षी या नगरपालिकेने देशात ४९ वा तर राज्यात ३९ वा क्रमांक पटकाविला होता़ गेल्या वर्षाचा सुविधांमध्ये अधिक भर पडल्यामुळे यावर्षी टॉपर शहरामध्ये या नगरपालिकेचा समावेश करण्यात आला़राज्यात प्रथम क्रमांक कराड, द्वितीय लोनावळा, तृतीय रत्नागिरी, चतुर्थ क्रमांक बालापूर, पाचवा संगमनेर तर सहावा क्रमांक शिरपूर पालिकेने प्राप्त केला आहे़ या पालिकेला ४२९४़६७ गुण प्राप्त केले आहे़माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, सीईओ अमोल बागुल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, माधवराव पाटील यांनी अभियानात शहरवासियांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़स्मार्ट सिटी योजना सरकारने जाहिर करण्यापूर्वीच शिरपूर नगरपालिकेची वाटचाल माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या दुरदृष्टीतून सुरू झाली आहे़ त्यादृष्टीने कॉलनी वसाहतींमधील खुल्या जागेवर लाखो निंब वृक्षाची झाडे लावली आहेत़ सांडपाण्याची प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला आहे़ पिण्याच्या पाण्याचे पुढील ३० वर्षाचे नियोजन, स्वच्छता, महिलांसाठी गार्डन, नागरिकांच्या आरोग्यासाठी योग विद्याधामची उभारणी, अद्ययावत असे इंदिरा गांधी हॉस्पिटल, स्वच्छतेसाठी लागणारे आधुनिक यंत्रे खरेदी करून त्याद्वारे स्वच्छतेचे कामे सुरू आहे़-जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा