शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
5
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
6
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
7
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
8
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
9
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
10
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
11
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
12
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
13
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
14
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
15
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
16
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
17
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
18
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
19
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
20
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'

लोकसहभागातून ग्रामविकास करणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व महाराष्ट्र जल बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयो नदी ...

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व महाराष्ट्र जल बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयो नदी को जानीए समन्वयो का समन्वय’ या ऑनलाइन वेबिनारमध्ये ते बोलत होते.

जलबिरादरीचे नरेंद्र छुग, विनोद बोधनकर, जळगाव विद्यापीठाचे समन्वयक डॉ. पंकज नन्नवरे, सहसमन्वयक डॉ. सचिन नांद्रे, सुबोध पाटील, विशाल सोनकुळे आदी उपस्थित होते.

चैत्राम पवार पुढे म्हणाले की, ग्रामविकासाचा हा यज्ञ देशातील प्रत्येक गावात तरुणांच्या सहभागाने यशस्वीपणे राबविता येऊ शकतो. जल, जंगल, जमीन, जन, जनावर या पंचसूत्रीच्या व्यवस्थापनाने काम केले, तर यश निश्चित मिळेल.

शिरपूरचे भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर म्हणाले की, भूपृष्ठावर पाणी थांबवायचे असेल, तर लहान -मोठे बंधारे बांधून पाणी जिरविणे महत्त्वाचे आहे. असा प्रयोग शिरपूर तालुक्यातील ७० गावांच्या पाण्याची पातळी 300 फुटांवरून ७० फुटांवर आणून यशस्वी केल्यामुळेच, शिरपूर पॅटर्नला सर्वदूर ओळख आहे.

साक्रीचे कॉम्रेड सुभाष कांकुस्ते यांनी वनहक्क कायदा व आदिवासींच्या समस्यांविषयी माहिती दिली. धुळे कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. दिनेश नांद्रे यांनी शासनाच्या कृषी संदर्भातील विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सुयोग्य रीतीने पोहोचविल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदवन फुलविता येईल, असे सांगितले. डॉ. धनंजय नेवाडकर यांनी लामकानी गावाच्या माळरानावर पाणलोट विकासाचे कार्य अनुभवातून मांडले. दोंडाईचा अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी जलसाक्षरतेचा झेंडा हातात घेऊन तलाठी व परिसरातील गावातील ग्रामस्थांना पाणी फाउंडेशन विषयी भारूड, भजन, गाणे म्हणून जागृती केली. यावेळी बचत गटाच्या प्रवर्तक मीना भोसले यांनी स्त्रियांना आर्थिक स्वावलंबनाचे धडे देत त्यातील लक्ष्मीरूपाचा परिचय करून, स्त्री स्वावलंबनाचा मार्ग दाखविला.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम कोळेकर, प्राचार्य बी.एम.भामरे, प्रा. डॉ. लहू पवार (साक्री), आरीफ शेख (निजामपूर) यांनी विविध विषयांवर माहिती दिली. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. सचिन नांद्रे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी महाराष्ट्र जल बिरादरी आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून नवीन दिशा देऊन सशक्त भारत सुजलाम सुफलाम होईल, असे ते म्हणाले.

या ऑनलाइन संवाद यात्रेत नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर, महाराष्ट्र जल बिरादरीचे विनोद बोधनकर, नरेंद्र छुग, सुबोध पाटील, विशाल सोनकुळे, दहिवेलचे प्राचार्य डॉ. सुरेश अहिरे, विमलबाई पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एस सोनवणे, माजी प्राचार्य बी. एस. पाटील यांच्यासह ७० जणांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळा यशस्वीतेसाठी रासेयोचे स्वयंसेवक अनिल बागूल, जयेश नांद्रे, भावेश बच्छाव यांनी परिश्रम घेतले.