शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरला कृषी अधिकाऱ्याच्या टेबलावर ठेवले सडलेले पीके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 14:50 IST

प्रहार जनशक्ती पार्टीचा राडा, नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

आॅनलाइन लोकमतशिरपूर (जि.धुळे) :तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास उशीर होत असल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तालुका कृषी कार्यालयात राडा करण्यात आला. तसेच कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावरच सडके पीके ठेवली. कार्यालयाच्या आवारात सडलेल्या पिकांची रोपे फेकण्यात आल्याची घटना आज घडली.शिरपूर तालुक्यात गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व भागातील नदी,नाले,जलाशये व सिंचन प्रकल्प काही प्रमाणात भरून नद्यांनी प्रवाहाचा वेग धरला आहे .कमी जास्त प्रमाणात होत असलेल्या पावसाने ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. पिके पिवळी पडली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे आतोनात नुकसान झाले आहे. जास्त पावसामुळे मुख्य पीक असलेले मुग,उडीद, कापूस ही पीके हातची गेली आहेत. आधीच शेतकरी करोनाचा आस्मानी संकटामुळे प्रचंड अडचणीत आला असून, त्याला आता अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. कोरोना काळात शेतकºयांचे होत्याचे नव्हते झाले. खरिपांच्या पिकांवर आशा होती. पाऊसही सुरवातीला चांगला झाला. नंतर अतिवृष्टीने पीके सडू लागली.सरकार घोषणा करते,परंतु अजूनही बँकांच्या धोरणामुळे शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध होत नाही.नुकताच्या झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले असून,खरीप पिके पिवळी पडत आहे. मूग पिकाच्या शेंगा झाडावरचं सडायाला लागल्या आहेत. शेतीतील नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे त्वरित करून शेतकºयांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी.जेणेकरून खरिपाचे झालेले प्रचंड नुकसान शेतकरी रव्बी पीकांमधून जसे जमेल तेवढे भरून काढण्याचा प्रयत्न करतील. पण त्यासाठी रव्बी पेरणी आधीच त्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी प्रहार जनशक्तीची मागणी आहे.नुकसानीचे पंचनामे तात्काळ न झाल्यास कृषी कार्यालयातील कृषी अधिकाºयांसह सर्व मंडळ अधिकाºयांना काळे फासू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष शिरपूर यांच्या वतीने देण्यात आला.यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, विजय कोळी, स्वप्निल राजपूत, नितीन जाधव, निलेश कोळी, मनोज राजपूत, मुकेश पाटील, महेंद्र पाटील, योगेश माळी, प्रमोद बडगुजर, किशोर बोरसे, नाना माळी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे