शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिरपूरला कृषी अधिकाऱ्याच्या टेबलावर ठेवले सडलेले पीके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 14:50 IST

प्रहार जनशक्ती पार्टीचा राडा, नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

आॅनलाइन लोकमतशिरपूर (जि.धुळे) :तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास उशीर होत असल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तालुका कृषी कार्यालयात राडा करण्यात आला. तसेच कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावरच सडके पीके ठेवली. कार्यालयाच्या आवारात सडलेल्या पिकांची रोपे फेकण्यात आल्याची घटना आज घडली.शिरपूर तालुक्यात गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व भागातील नदी,नाले,जलाशये व सिंचन प्रकल्प काही प्रमाणात भरून नद्यांनी प्रवाहाचा वेग धरला आहे .कमी जास्त प्रमाणात होत असलेल्या पावसाने ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. पिके पिवळी पडली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे आतोनात नुकसान झाले आहे. जास्त पावसामुळे मुख्य पीक असलेले मुग,उडीद, कापूस ही पीके हातची गेली आहेत. आधीच शेतकरी करोनाचा आस्मानी संकटामुळे प्रचंड अडचणीत आला असून, त्याला आता अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. कोरोना काळात शेतकºयांचे होत्याचे नव्हते झाले. खरिपांच्या पिकांवर आशा होती. पाऊसही सुरवातीला चांगला झाला. नंतर अतिवृष्टीने पीके सडू लागली.सरकार घोषणा करते,परंतु अजूनही बँकांच्या धोरणामुळे शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध होत नाही.नुकताच्या झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले असून,खरीप पिके पिवळी पडत आहे. मूग पिकाच्या शेंगा झाडावरचं सडायाला लागल्या आहेत. शेतीतील नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे त्वरित करून शेतकºयांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी.जेणेकरून खरिपाचे झालेले प्रचंड नुकसान शेतकरी रव्बी पीकांमधून जसे जमेल तेवढे भरून काढण्याचा प्रयत्न करतील. पण त्यासाठी रव्बी पेरणी आधीच त्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी प्रहार जनशक्तीची मागणी आहे.नुकसानीचे पंचनामे तात्काळ न झाल्यास कृषी कार्यालयातील कृषी अधिकाºयांसह सर्व मंडळ अधिकाºयांना काळे फासू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष शिरपूर यांच्या वतीने देण्यात आला.यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, विजय कोळी, स्वप्निल राजपूत, नितीन जाधव, निलेश कोळी, मनोज राजपूत, मुकेश पाटील, महेंद्र पाटील, योगेश माळी, प्रमोद बडगुजर, किशोर बोरसे, नाना माळी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे