शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

शेळ्या-मेंढ्यांसाठी रान मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 13:27 IST

कापडणे : पाणीटंचाईमुळे पांढऱ्या कांद्याची रोपे कवडीमोल, दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल

कापडणे : शेतकऱ्यांनी अतोनात मेहनत घेऊन शेतात पांढºया कांद्याची रोपे तयार केली. मात्र, पाणीटंचाई असल्याने शेतकऱ्यांना ही कांदा रोपे विक्रीस काढावी लागली. परंतू सातत्याने कांद्याला तुटपुंजा भाव मिळत असल्याने उन्हाळी कांदा लागवडीकडे शेतकºयांनी पाठ फिरविल्यामुळे या रोपांना ग्राहकच उपलब्ध झाले नाही. अखेर आर्थिक फटका सहन करीत शेतकºयांनी कांदा रोपाच्या शेतात शेळ्या-मेंढ्यांना चारण्यास मुभा दिल्याचे भयावह वास्तव धमाणे शिवारात दिसून आले.धुळे तालुक्यातील धमाणे, न्याहळोद, बिलाडीरोड, देवभाने, कौठळ, धनुर, तामसवाडी आदी शिवारातील शेतकºयांनी उन्हाळी हंगामात पांढरा कांदा पिकाची लागवड करण्यासाठी आप-आपल्या शेतात पाणीटंचाईचे नियोजन करूनही कांदा रोपाची लागवड केली.मात्र, सर्वत्र शेत शिवारातील विहिरी, कुपनलिकांची पाण्याची पातळी कमालीची खोल गेली आहे. अनेक ठिकाणी विहिरी आटल्या आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात ज्या विहिरी दीड ते दोन तास चालायच्या. त्याच विहिरी व कूपनलिका आता केवळ वीस ते तीस मिनिट चालतात तर काही विहिरीमधून शेतात गुरांना पाणी पाजण्यासाठी बांधण्यात आलेले पाण्याचे हौदच जेमतेम भरतात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कांदा पिक घेणे शक्य नसल्याने अनेक शेतकºयांनी मोठ्या आशेने तयार केलेली पांढºया कांद्याची रोपे विक्रीसाठी काढली. मात्र, कांदा रोपे घेण्यासाठी कुणीही शेतकरी इच्छूक नसल्याने दीड महिने जीवापाड जपलेल्या कांदा रोपांचे करायचे काय, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला. आणि अखेर शेतकºयांनी कांदा रोपाच्या शेतात शेळ्या मेंढ्यांना चारण्यास गुराख्यांना मुभा दिली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे