शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कोरोना झाल्यानंतरच अन्य आजारांची धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST

धुळे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. योग्य उपचारानंतर अनेकांना घरी सोडण्यात आले आहेत. मात्र ...

धुळे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. योग्य उपचारानंतर अनेकांना घरी सोडण्यात आले आहेत. मात्र कोरोना झाल्यानंतर रोग प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे अशा रूग्णांना जबड्यातील बुरशिजन्य आजार, मधुमेह होण्याचे प्रमाण वाढले आहे. या आजाराला घाबरून जाण्याचे कारण जरी नसले तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. या आजारावरील औषधी महागड्या असंल्याने केंद्र व राज्य सरकारकडून मोफत दिल्या जात आहे. हिरे महाविद्यालय व जिल्हा रूग्णालयात रूग्णांना उपचाराची व्यवस्था करण्यात आलेली असल्याची माहिती म्यूकरमायकोसिसचे जिल्हा नोडल अधिकारी डाॅ. नितीन पाटील यांनी दिली

प्रश्न : म्युकरमायकोसिस आजार काय आहे व आजाराची लागण कशी होते.?

उत्तर : म्यूकरमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने अशा लोकांना होतो, ज्यांना आधिपासूनच एखादा आजार आहे किंवा जे लोक अशा काही औषधींचे सतत सेवन करतात ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते किंवा इतर आजारांशी लढण्याची ताकद कमी होते. सध्या कोरोनातून बरे झालेले रूग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने त्यांना म्युकरमायकोसिसचा धोका जास्त असतो.

प्रश्न : म्युकरमायकोसिस सर्वाधिक धोका कोणाला असतो?

उत्तर : जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेले रूग्ण संख्या अधिक आहे. त्यामुळे कोरोना झालेल्या रूग्णांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते. तसेच जर मधुमेह असलेल्यांना रूग्णांला कोरोना झाला तर त्यांची रोग प्रतिकार शक्ती अधिक कमी होते. त्यामुळेे अशा लोकांना म्यूकरमायकोसिसचा धोका जास्त असतो. लक्षणे दिसून आल्यास तातडीने उपचार करावा.

प्रश्न : म्युकरमायकोसिस आजाराचे लक्षणे काय आहेत.?

उत्तर नेहमी जाणवणारी डोकेदुखी, अंगात बारीक ताप, गालावर सूज, हिरड्यांमधून पू येणे, पुळया येणे, डोळ्याना सुज येणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्यावर सूज असलेली त्वचा काळी पडणे, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, वरच्या जबडयातील दात हलने त्यात वेदना होणे, नाकावर अथवा वरच्या जबडयातील त्वचा काळी पडणे अशी लक्षणे आढळतात. लक्षणे दिसल्यास उपचार करावा.

म्यूकरमायकोसिस संसर्गजन्य नाही

म्यूकरमायकोसिस आजार एका व्यक्तिपासून दुसऱ्याला होत नाही. म्यूकरमायोसिस हा एक बुरशीजन्य आहे असून शरीराच्या ज्या भागात याची लागण होते, त्याला तो नष्ट करतो. मात्र, वेळेत योग्य उपचार घेतल्यास यापासून वाचता येऊ शकते. या आजाराला घाबरून जाण्याचे काम कारण नाही. मात्र दुर्लक्ष करून देखील चालणारे नाही.

म्यूकरमायकोसिस जिल्ह्यात २५० रूग्ण

कोरोनातून बरे झालेले बहूतांश रूग्ण म्यूकर मायकोसिस आजाराचे आढळून आलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत म्यूकोरमायकोसिस या बुरशिजन्य आजाराचे २०० ते २५० रुग्ण आढळून आलेत. दरम्यान आतापर्यत जिल्हयातील तीन रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

मोफत उपचार

महात्मा फुले जीवनदायी योजनेत या आजाराचा समावेश करण्यात आल्याने खाजगी व सरकारी रूग्णालयातून मोफत उपचार होत आहे.