शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

दंगेखोरांची गय नाही, प्रशासन मुळार्पयत पोहोचणार

By admin | Updated: January 26, 2016 00:38 IST

नंदुरबार : गाव, शहर अशांत करून आणि बंद पुकारून लोकांना वेठीस धरू नका.

नंदुरबार : गाव, शहर अशांत करून आणि बंद पुकारून लोकांना वेठीस धरू नका. मूठभर लोक जिल्ह्यातील शांतता बिघडविण्याचे काम करीत असल्याने त्यांच्या मुळार्पयत पोहचून पडद्यामागचे चेहरे प्रशासन उघड करेल आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली असल्याचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी सोमवारी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत सांगितले.

गेल्या दोन आठवडय़ातील घटनांच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश घुर्ये यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत सदस्यांनी पोलिस व जनतेत संवाद नसल्याचा आरोप डॉ.मतीन शेख यांनी केला. देवेंद्र जैन यांनी व्यापा:यांना जबरदस्तीने बंद करण्यास काही लोक भाग पाडतात, असा आरोप केला.

तोच धागा पुढे पकडत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पोलिसांनी अशा लोकांवर कठोर कारवाई करावी, असे सांगत पोलिसांच्या नरमाईच्या भूमिकेवर टोलेबाजी केली. ते म्हणाले, शहरात पोलिसांचा धाक राहिला नाही, म्हणूनच विघातक शक्तींना बळ मिळत आहे. अगदी पोलीस ठाण्यात येऊन लोक पोलीस अधिका:यांची कॉलर धरतात. अशा घटना दुर्दैवी आहेत. पोलिसांनी कठोर व्हावे, अशी सूचना करीत त्यांनी शहरातील फलकांबाबत पालिकेची भूमिका मांडली. यापुढे जर सर्वाची इच्छा असेल तर कुणालाही फलक लावण्यास परवानगी देणार नाही.

आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी परवानगीच देवू नये असे ठामपणे सांगत फलक लावणा:यांवर यापुढे प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले. पोलिसांवर त्यांनीही आरोप करीत आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन केले. पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिलाच पाहिजे; पण त्याचे रक्षकच कर्तव्य विसरत असल्याचे त्यांनी सांगितले.

शांतता समितीतील प्रत्येक सदस्याने जर आपापल्या गल्लीतही शांतता ठेवण्यासाठी प्रय} केल्यास दंगे होणारच नाही. यापुढे पालिका व प्रशासनानेही प्रत्येक दुकानाला आणि कॉलनींना परवानगी देताना सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करावे, शिवाय प्रशासनानेही पुढाकार घेऊन या योजनेला गती द्यावी, असे सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश घुर्ये यांनी पोलीस आपले काम चोख बजावत आहे. यापुढे काही चुका असल्यास त्या दूर करून अधिक जोमाने काम करू, पण त्यासाठी जनतेचेही सहकार्य असावे. प्रत्येक दंगलीत जखमी होणारा पोलीसच असतो. लोकांचे रक्षण करण्यासाठी तो स्वत: आपल्या अंगावर दगडांचा मार ङोलतो. दगड मारणारा एकच असतो; पण 99 जण ते पाहात असतात. त्यामुळे 99 जणांनी त्या एकाचा हात रोखल्यास दंगलच होणार नाही, असे सांगितले.या वेळी समितीतील अनेक सदस्यांनी आपली मते मांडली.