शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

दंगेखोरांची गय नाही, प्रशासन मुळार्पयत पोहोचणार

By admin | Updated: January 26, 2016 00:38 IST

नंदुरबार : गाव, शहर अशांत करून आणि बंद पुकारून लोकांना वेठीस धरू नका.

नंदुरबार : गाव, शहर अशांत करून आणि बंद पुकारून लोकांना वेठीस धरू नका. मूठभर लोक जिल्ह्यातील शांतता बिघडविण्याचे काम करीत असल्याने त्यांच्या मुळार्पयत पोहचून पडद्यामागचे चेहरे प्रशासन उघड करेल आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली असल्याचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी सोमवारी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत सांगितले.

गेल्या दोन आठवडय़ातील घटनांच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश घुर्ये यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत सदस्यांनी पोलिस व जनतेत संवाद नसल्याचा आरोप डॉ.मतीन शेख यांनी केला. देवेंद्र जैन यांनी व्यापा:यांना जबरदस्तीने बंद करण्यास काही लोक भाग पाडतात, असा आरोप केला.

तोच धागा पुढे पकडत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पोलिसांनी अशा लोकांवर कठोर कारवाई करावी, असे सांगत पोलिसांच्या नरमाईच्या भूमिकेवर टोलेबाजी केली. ते म्हणाले, शहरात पोलिसांचा धाक राहिला नाही, म्हणूनच विघातक शक्तींना बळ मिळत आहे. अगदी पोलीस ठाण्यात येऊन लोक पोलीस अधिका:यांची कॉलर धरतात. अशा घटना दुर्दैवी आहेत. पोलिसांनी कठोर व्हावे, अशी सूचना करीत त्यांनी शहरातील फलकांबाबत पालिकेची भूमिका मांडली. यापुढे जर सर्वाची इच्छा असेल तर कुणालाही फलक लावण्यास परवानगी देणार नाही.

आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी परवानगीच देवू नये असे ठामपणे सांगत फलक लावणा:यांवर यापुढे प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले. पोलिसांवर त्यांनीही आरोप करीत आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन केले. पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिलाच पाहिजे; पण त्याचे रक्षकच कर्तव्य विसरत असल्याचे त्यांनी सांगितले.

शांतता समितीतील प्रत्येक सदस्याने जर आपापल्या गल्लीतही शांतता ठेवण्यासाठी प्रय} केल्यास दंगे होणारच नाही. यापुढे पालिका व प्रशासनानेही प्रत्येक दुकानाला आणि कॉलनींना परवानगी देताना सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करावे, शिवाय प्रशासनानेही पुढाकार घेऊन या योजनेला गती द्यावी, असे सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश घुर्ये यांनी पोलीस आपले काम चोख बजावत आहे. यापुढे काही चुका असल्यास त्या दूर करून अधिक जोमाने काम करू, पण त्यासाठी जनतेचेही सहकार्य असावे. प्रत्येक दंगलीत जखमी होणारा पोलीसच असतो. लोकांचे रक्षण करण्यासाठी तो स्वत: आपल्या अंगावर दगडांचा मार ङोलतो. दगड मारणारा एकच असतो; पण 99 जण ते पाहात असतात. त्यामुळे 99 जणांनी त्या एकाचा हात रोखल्यास दंगलच होणार नाही, असे सांगितले.या वेळी समितीतील अनेक सदस्यांनी आपली मते मांडली.