शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मानव समाजासाठी खरी गरज नितीमूल्यांची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 21:54 IST

संडे अँकर । प्रजापिता ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी राजयोगीनी विजयादिदिंचे प्रतिपादन

विशाल गांगुर्डे । लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : मानव समाजाला खरी गरज नितीमूल्यांची आहे. एकजुटीनं प्रामाणिक प्रयत्न केल्यास सर्व समस्या प्रश्नांवर उपाय शक्य आहे. आपापसातील द्वेष, वैरभाव, तिरस्कार विसरून परस्पर सहयोग, आदर, प्रेमसारखी नितीमूल्य समाजात बाणवण्याची आज आवश्यकता आहे असे प्रतिपादन ब्रम्हाकुमारी विजयादीदी यांनी प्रतिपादन केले.साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथीले प्रजापिता ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. ‘नितीमूल्याधिष्ठीत समाजाचे निर्माण’ ह्या ब्रम्हाकुमारीजच्या उपक्रमात जास्तीत जास्त सहभागाची आता खरी गरज आहे, असे सांगत दीदींनी सर्वांना केंद्रास भेट देण्याचे आवाहन केले.  घनश्याम पवार आपल्या मनोगतात म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती जेव्हा ज्याही स्थितीत असते त्याला ती स्वत:च सर्वस्वी जबाबदार असते. कर्माची गती अतिशय गुह्य आहे, आपले विचारवाणी कर्मच आपलं नशिब घडवत असतात. तेव्हा आपल्या विचारवाणी कर्मांवर आपले लक्ष असावे. त्यानंतर प्रकाश क्षीरसागर, प्रभाकर भाई, भोगेभाई यांनीही सभेस मार्गदर्शन केले. तत्पूर्वी उषा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून सद्भावना फेरी काढण्यात आली. देशशिरवाडे गावाचे सरपंच सुमर्न ठाकरे, उपसरपंच निलेश पगारे, जि.प. सदस्य विलास बिरारीस, सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच विजय महाजन यांच्या उपस्थितीत ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या नवीन वास्तूचे उद्घाटन तथा ध्वजारोहण पार पडले.  शेवटी सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमास धुळे, नंदुरबार, नेर, अंतापुर, जायखेडा, बल्हाणे, चिकसे, पानखेडा, सामोडे, पिंपळनेर तथा परिसरातून बी.के.परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुकाराम सोनवणे, साधना जगताप, दिगंबर सोनवणे, रुपाली पगारे, रोहिणी हिरे, पार्वती सोनवणे, काशिनाथ दुसाने, गुरुदत घरटे आदींनी परिश्रम घेतले.

उपाय तोकडे़़आजचा मनुष्य हा अनेकानेक समस्यांनी ग्रस्त दिसतो, सर्वच क्षेत्रात सततची जीवघेणी स्पर्धा, स्वास्थ्य, बेरोजगारी, भ्रष्टाचार, त्यातच पुन्हा दुष्काळ, नापिकी, पाणी टंचाई सारख्या नैसर्गिक आपदा, या सर्वांनी तो पुरता हतबल झालाय. समस्या सोडवण्यासाठीचे त्याचे सर्वप्रकारचे उपाय तोकडे ठरताहेत. येणारा काळ तर आणखीच भीषण असू शकेल. तेव्हा ह्या प्रश्नांवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची अत्यंत गरज आहे, मानवी प्रयत्नांना अध्यात्माचीही जोड हवी.

टॅग्स :Dhuleधुळे