शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

मानव समाजासाठी खरी गरज नितीमूल्यांची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 21:54 IST

संडे अँकर । प्रजापिता ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी राजयोगीनी विजयादिदिंचे प्रतिपादन

विशाल गांगुर्डे । लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : मानव समाजाला खरी गरज नितीमूल्यांची आहे. एकजुटीनं प्रामाणिक प्रयत्न केल्यास सर्व समस्या प्रश्नांवर उपाय शक्य आहे. आपापसातील द्वेष, वैरभाव, तिरस्कार विसरून परस्पर सहयोग, आदर, प्रेमसारखी नितीमूल्य समाजात बाणवण्याची आज आवश्यकता आहे असे प्रतिपादन ब्रम्हाकुमारी विजयादीदी यांनी प्रतिपादन केले.साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथीले प्रजापिता ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. ‘नितीमूल्याधिष्ठीत समाजाचे निर्माण’ ह्या ब्रम्हाकुमारीजच्या उपक्रमात जास्तीत जास्त सहभागाची आता खरी गरज आहे, असे सांगत दीदींनी सर्वांना केंद्रास भेट देण्याचे आवाहन केले.  घनश्याम पवार आपल्या मनोगतात म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती जेव्हा ज्याही स्थितीत असते त्याला ती स्वत:च सर्वस्वी जबाबदार असते. कर्माची गती अतिशय गुह्य आहे, आपले विचारवाणी कर्मच आपलं नशिब घडवत असतात. तेव्हा आपल्या विचारवाणी कर्मांवर आपले लक्ष असावे. त्यानंतर प्रकाश क्षीरसागर, प्रभाकर भाई, भोगेभाई यांनीही सभेस मार्गदर्शन केले. तत्पूर्वी उषा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून सद्भावना फेरी काढण्यात आली. देशशिरवाडे गावाचे सरपंच सुमर्न ठाकरे, उपसरपंच निलेश पगारे, जि.प. सदस्य विलास बिरारीस, सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच विजय महाजन यांच्या उपस्थितीत ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या नवीन वास्तूचे उद्घाटन तथा ध्वजारोहण पार पडले.  शेवटी सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमास धुळे, नंदुरबार, नेर, अंतापुर, जायखेडा, बल्हाणे, चिकसे, पानखेडा, सामोडे, पिंपळनेर तथा परिसरातून बी.के.परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुकाराम सोनवणे, साधना जगताप, दिगंबर सोनवणे, रुपाली पगारे, रोहिणी हिरे, पार्वती सोनवणे, काशिनाथ दुसाने, गुरुदत घरटे आदींनी परिश्रम घेतले.

उपाय तोकडे़़आजचा मनुष्य हा अनेकानेक समस्यांनी ग्रस्त दिसतो, सर्वच क्षेत्रात सततची जीवघेणी स्पर्धा, स्वास्थ्य, बेरोजगारी, भ्रष्टाचार, त्यातच पुन्हा दुष्काळ, नापिकी, पाणी टंचाई सारख्या नैसर्गिक आपदा, या सर्वांनी तो पुरता हतबल झालाय. समस्या सोडवण्यासाठीचे त्याचे सर्वप्रकारचे उपाय तोकडे ठरताहेत. येणारा काळ तर आणखीच भीषण असू शकेल. तेव्हा ह्या प्रश्नांवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची अत्यंत गरज आहे, मानवी प्रयत्नांना अध्यात्माचीही जोड हवी.

टॅग्स :Dhuleधुळे