शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

रब्बी हंगाम : सदोष डीपीमुळे पिके जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला. पाण्याची पातळी वाढल्याने रब्बी पिकांवर आशा होती. परंतु वीजपुरवठा वारंवार बंद पडत ...

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला. पाण्याची पातळी वाढल्याने रब्बी पिकांवर आशा होती. परंतु वीजपुरवठा वारंवार बंद पडत असल्याने शेवटच्या एका पाण्यासाठी पिके जळाली आहेत. डीपी जळल्याने शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये भरले, मात्र नवीन प्रत्येक डीपी अवघ्या काही तासात जळून जाते. चारवेळा नवीन डीपी बसवूनसुद्धा सदोष यंत्रणेमुळे वीजपुरवठा सुरू होऊ शकला नाही.

पिके वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी डिझेल पंप बसवले आहेत. परंतु महागडे इंधन भरून पाणी भरताना मोठा खर्च येत आहे. डीपी जळाली म्हणजे वायरमन तपासणी करतात, दुसरे दिवशी ऑफिसला रिपोर्ट जातो, काही दिवसांनी डीपी येते, एक दिवस कार्यान्वित करून दुसरे दिवशी वीजपुरवठा सुरू करतात. यात एक आठवडा जातो अन‌् अखेर जळलेली डीपी असल्याचे दिसून येते. चारवेळा ही प्रक्रिया सुरू असल्याने एक महिना वीजपुरवठा बंद आहे.

तक्रारी नंतर वीज अधिकारी डीपी बदलतात, परंतु नवीनदेखील नादुरुस्त

असली तरी आठ दिवसांपर्यंत तक्रारी बंद होतात. हे सारे टाइमपासचे धोरण असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. या टाइम पास धोरणात मात्र शेतकऱ्यांची पिके जळाली आहेत. पैसे भरून देखील वीजपुरवठा करू न शकणाऱ्या वीज मंडळाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

( वीज पंप बंद असल्याने डिझेल मशीन आणले, यात इंधन व मशीन भाडे याचा खर्च वाढला आहे. भाडे दहा हजार व इंधन १३ हजार खर्च लागल्याने रब्बीत नफा राहणे कठीण झाले आहे )

---

शेतकरी संजय रोकडे

( लवकरच विशेष योजनेत योग्य क्षमतेची डीपी बसविली जाईल. प्रयत्न सुरू आहेत. )---

ग्रामीण उपकार्यकरी अभियंता एन बी गांगोडे .