शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

रब्बी हंगाम : सदोष डीपीमुळे पिके जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला. पाण्याची पातळी वाढल्याने रब्बी पिकांवर आशा होती. परंतु वीजपुरवठा वारंवार बंद पडत ...

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला. पाण्याची पातळी वाढल्याने रब्बी पिकांवर आशा होती. परंतु वीजपुरवठा वारंवार बंद पडत असल्याने शेवटच्या एका पाण्यासाठी पिके जळाली आहेत. डीपी जळल्याने शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये भरले, मात्र नवीन प्रत्येक डीपी अवघ्या काही तासात जळून जाते. चारवेळा नवीन डीपी बसवूनसुद्धा सदोष यंत्रणेमुळे वीजपुरवठा सुरू होऊ शकला नाही.

पिके वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी डिझेल पंप बसवले आहेत. परंतु महागडे इंधन भरून पाणी भरताना मोठा खर्च येत आहे. डीपी जळाली म्हणजे वायरमन तपासणी करतात, दुसरे दिवशी ऑफिसला रिपोर्ट जातो, काही दिवसांनी डीपी येते, एक दिवस कार्यान्वित करून दुसरे दिवशी वीजपुरवठा सुरू करतात. यात एक आठवडा जातो अन‌् अखेर जळलेली डीपी असल्याचे दिसून येते. चारवेळा ही प्रक्रिया सुरू असल्याने एक महिना वीजपुरवठा बंद आहे.

तक्रारी नंतर वीज अधिकारी डीपी बदलतात, परंतु नवीनदेखील नादुरुस्त

असली तरी आठ दिवसांपर्यंत तक्रारी बंद होतात. हे सारे टाइमपासचे धोरण असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. या टाइम पास धोरणात मात्र शेतकऱ्यांची पिके जळाली आहेत. पैसे भरून देखील वीजपुरवठा करू न शकणाऱ्या वीज मंडळाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

( वीज पंप बंद असल्याने डिझेल मशीन आणले, यात इंधन व मशीन भाडे याचा खर्च वाढला आहे. भाडे दहा हजार व इंधन १३ हजार खर्च लागल्याने रब्बीत नफा राहणे कठीण झाले आहे )

---

शेतकरी संजय रोकडे

( लवकरच विशेष योजनेत योग्य क्षमतेची डीपी बसविली जाईल. प्रयत्न सुरू आहेत. )---

ग्रामीण उपकार्यकरी अभियंता एन बी गांगोडे .