शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

नीट परीक्षा आवश्यकच, पण अभ्यासक्रम एकच असावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST

भूषण चिंचोरे धुळे - वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट ही पूर्वपरीक्षा घेणे आवश्यक आहे. पण पूर्ण देशभरातील अभ्यासक्रम एकच ...

भूषण चिंचोरे

धुळे - वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट ही पूर्वपरीक्षा घेणे आवश्यक आहे. पण पूर्ण देशभरातील अभ्यासक्रम एकच असावा असे मत धुळ्यातील शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

तामिळनाडू राज्याने नीट परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देणार असल्याचे सांगितले आहे. तामिळनाडू सरकारच्या या निर्णयाबाबत शिक्षण तज्ज्ञ व विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली. काही विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा घेऊ नये तर काहींनी परीक्षा घ्यायला हवी असे मत मांडले.

राज्यातील अभ्यासक्रमापेक्षा नीट परीक्षेचा अभ्यासक्रम अधिक व्यापक असतो. या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये सुसंगतपणा आणणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या परीक्षेचा विद्यार्थी व पालक अधिक ताण घेतात. अनेक विद्यार्थी दबावात ही परीक्षा देत असतात. नीटची परीक्षा तणावमुक्त वातावरणात व्हायला हवी तसेच परीक्षेसाठी केला जाणारा खर्च व दबाव दोन्ही कमी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय ?

नीट परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू राज्यातील विधानसभेत मांडले गेले आणि संमत ही झाले. सरकारी व खासगी संस्थांमध्ये वैद्यकीय पदवीच्या जागांसाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत.

धक्कादायक निर्णय

वैद्यकीय शिक्षणासाठी नीट परीक्षा आवश्यक आहे. मात्र त्यात काही बदल होणे आवश्यक आहेत. बारावीचा अभ्यासक्रम व नीट परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा आहे. नीट परीक्षेसाठी संपूर्ण देशातील बारावीचा अभ्यासक्रम एकच असावा.

डॉ. प्रा. पी. एच. पाटील

प्राचार्य, जयहिंद महाविद्यालय

वैद्यकीय शिक्षणासाठी पूर्व परीक्षा आवश्यकच आहे. पण विद्यार्थ्यांनी या परीक्षेचे दडपण घेऊ नये. या परीक्षेसाठीचा खर्च व तणाव दोन्हीही कमी झाले पाहिजेत. तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी.

डॉ. प्रा. एम. व्ही. पाटील

प्राचार्य, घोगरे महाविद्यालय

नीट ही राष्ट्रीय स्तरावरची एक महत्त्वाची परीक्षा आहे. वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मात्र त्या सर्वांनाच प्रवेश मिळणे शक्य नाही. चाळणीचे कमी ही परीक्षा करत असल्याने महत्त्वाची आहे.

- संघर्ष पवार, विद्यार्थी

नीट ही परीक्षा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवणे सोपे जाते. ही परीक्षा पारदर्शकपणे घेतली जाते. राज्याच्या स्तरावर अशी परीक्षा झाली तर पारदर्शकपणे होणार नाही असे वाटते.

- सृष्टी सूर्यवंशी, विद्यार्थी