शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

आदिवासी संस्कृतीचे अस्तित्व टिकवा

By admin | Updated: January 5, 2017 23:10 IST

आदिवासी समाज स्नेहसंमेलन : तळोदा येथे ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे यांचे आवाहन

रांझणी : आदिवासी समाजातील खर्चिक व अनिष्ट चालीरिती बदलण्याच्या नावावर समाजाच्या रुढी व परंपरांना फाटा देऊ नका, त्या जोपासा. संस्कृती टिकली तरच आदिवासींचे अस्तित्व टिकेल, असे प्रतिपादन साहित्यिक, कवी वाहरू सोनवणे यांनी तळोदा येथे आदिवासी समाज स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलताना केले.तळोदा येथील चिनोदा चौफुलीजवळ आदिवासी समाज स्नेहसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी साहित्यिक वाहरू सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, राजेंद्र गावीत, जि.प.चे उपाध्यक्ष सुहास नाईक, भीमसिंग वळवी, डॉ.राजेश वळवी, जि.प. सदस्य जितेंद्र पाडवी, सतीश वळवी, वेस्ता पावरा, पं.स. सभापती शांताबाई पवार, उपसभापती दीपक मोरे, नितीन पाडवी, वीरसिंग पाडवी, नगरसेवक सत्यवान पाडवी, पं.स.चे माजी आकाश वळवी, पं.स. सदस्य हूपा धना वळवी, जि.प.चे माजी सदस्य दिवाकर पवार, किसन महाराज, सरपंच बळीराम वळवी, ङोलसिंग पावरा, कथा पावरा आदी उपस्थित होते.संमेलनाचे उद्घाटन देवमोगरा माता व आदिवासी संत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वाहरू सोनवणे म्हणाले की, आदिवासी समाजाने संघटित व्हा, सुशिक्षित व्हा, पैशांचा योग्य वापर करावा, सामाजिक सुधारणा करण्यासाठी स्वत:ला बदलले पाहिजे, सामाजिक रुढी परंपरा जोपासा पण अनाठायी खर्च करू नका, सामाजिक संस्कृतीची जोपासना करावी. रुढी परंपरा टिकेल तरच संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर समाज टिकेल, समाजासाठी योगदान देऊन सुशिक्षित तरुणांनी समाजाच्या रुढीपरंपरा, रितीरिवाज संस्कृतीचा अभ्यास करण्याचे आवाहन त्यानी केले.अॅड.पद्माकर वळवी यांनी सांगितले की, आदिवासी समाजाचे अनेक संमेलने होतात हे वेगळे सामाजिक संमेलन घेतले आहे. या वेळी समाजात थोडा बदल घडवित समाजाचे रुढीपरंपरा जोपासत नवी कास धरली पाहिजे. तसेच समाज संघटित नसल्याने आपल्या समाजावर बोगस आदिवासी म्हणून प्रमाणपत्र घेऊन अतिक्रमण सुरु आहे. त्यासाठी एकत्र येऊन सामाजिक संघटन होऊन लढा दिला पाहिजे. शिक्षणावर भर द्या, व्यसनमुक्त व्हा, समाजाने स्वाभिमानी व्हावे क्रांतीकारी पुरूष व संतांचा विचार आचरणात आणावे व त्याच शिकवणीवर चालले तरच समाजाला दिशा मिळेल, असे सांगितले.जि.प. उपाध्यक्ष सुहास नाईक, जितेंद्र पाडवी, ङोलसिंग पावरा, योगेश पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कांतीलाल पाडवी, रोहिदास पाडवी, प्रकाश ठाकरे, मांगीलाल वळवी, रणजित वळवी,  मोहन ठाकरे, कांताबाई ठाकरे, नारायण वळवी, सावित्रीबाई पाडवी, नवनाथ ठाकरे, मोग्या भिल, नेहरू नाईक, राजकुमार पाडवी व समाज बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक सतीश वळवी यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश ठाकरे यांनी तर आभार प्रवीण वळवी यांनी मानले. (वार्ताहर)