शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

आदिवासी संस्कृतीचे अस्तित्व टिकवा

By admin | Updated: January 5, 2017 23:10 IST

आदिवासी समाज स्नेहसंमेलन : तळोदा येथे ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे यांचे आवाहन

रांझणी : आदिवासी समाजातील खर्चिक व अनिष्ट चालीरिती बदलण्याच्या नावावर समाजाच्या रुढी व परंपरांना फाटा देऊ नका, त्या जोपासा. संस्कृती टिकली तरच आदिवासींचे अस्तित्व टिकेल, असे प्रतिपादन साहित्यिक, कवी वाहरू सोनवणे यांनी तळोदा येथे आदिवासी समाज स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलताना केले.तळोदा येथील चिनोदा चौफुलीजवळ आदिवासी समाज स्नेहसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी साहित्यिक वाहरू सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, राजेंद्र गावीत, जि.प.चे उपाध्यक्ष सुहास नाईक, भीमसिंग वळवी, डॉ.राजेश वळवी, जि.प. सदस्य जितेंद्र पाडवी, सतीश वळवी, वेस्ता पावरा, पं.स. सभापती शांताबाई पवार, उपसभापती दीपक मोरे, नितीन पाडवी, वीरसिंग पाडवी, नगरसेवक सत्यवान पाडवी, पं.स.चे माजी आकाश वळवी, पं.स. सदस्य हूपा धना वळवी, जि.प.चे माजी सदस्य दिवाकर पवार, किसन महाराज, सरपंच बळीराम वळवी, ङोलसिंग पावरा, कथा पावरा आदी उपस्थित होते.संमेलनाचे उद्घाटन देवमोगरा माता व आदिवासी संत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वाहरू सोनवणे म्हणाले की, आदिवासी समाजाने संघटित व्हा, सुशिक्षित व्हा, पैशांचा योग्य वापर करावा, सामाजिक सुधारणा करण्यासाठी स्वत:ला बदलले पाहिजे, सामाजिक रुढी परंपरा जोपासा पण अनाठायी खर्च करू नका, सामाजिक संस्कृतीची जोपासना करावी. रुढी परंपरा टिकेल तरच संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर समाज टिकेल, समाजासाठी योगदान देऊन सुशिक्षित तरुणांनी समाजाच्या रुढीपरंपरा, रितीरिवाज संस्कृतीचा अभ्यास करण्याचे आवाहन त्यानी केले.अॅड.पद्माकर वळवी यांनी सांगितले की, आदिवासी समाजाचे अनेक संमेलने होतात हे वेगळे सामाजिक संमेलन घेतले आहे. या वेळी समाजात थोडा बदल घडवित समाजाचे रुढीपरंपरा जोपासत नवी कास धरली पाहिजे. तसेच समाज संघटित नसल्याने आपल्या समाजावर बोगस आदिवासी म्हणून प्रमाणपत्र घेऊन अतिक्रमण सुरु आहे. त्यासाठी एकत्र येऊन सामाजिक संघटन होऊन लढा दिला पाहिजे. शिक्षणावर भर द्या, व्यसनमुक्त व्हा, समाजाने स्वाभिमानी व्हावे क्रांतीकारी पुरूष व संतांचा विचार आचरणात आणावे व त्याच शिकवणीवर चालले तरच समाजाला दिशा मिळेल, असे सांगितले.जि.प. उपाध्यक्ष सुहास नाईक, जितेंद्र पाडवी, ङोलसिंग पावरा, योगेश पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कांतीलाल पाडवी, रोहिदास पाडवी, प्रकाश ठाकरे, मांगीलाल वळवी, रणजित वळवी,  मोहन ठाकरे, कांताबाई ठाकरे, नारायण वळवी, सावित्रीबाई पाडवी, नवनाथ ठाकरे, मोग्या भिल, नेहरू नाईक, राजकुमार पाडवी व समाज बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक सतीश वळवी यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश ठाकरे यांनी तर आभार प्रवीण वळवी यांनी मानले. (वार्ताहर)