शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

पाण्याअभावी डाळींब बाग करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 11:48 IST

मालपूर परिसर : उन्हाने गाठला उच्चांक, उद्ध्वस्त झालेल्या बागेमुळे शेतकरी हवालदिल

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातील डाळींबाची बाग पाण्याअभावी करपून गेली आहे. यावर्षी उन्हाने उच्चांक गाठल्याने उष्णतेमुळे बाग पुन्हा बहरेल, याची शक्यताही उरलेली नाही. दुष्काळाच्या झळांची तीव्रता मालपूरसह परिसरात दिवसेंदिवस वाढत असून हा दुष्काळ चारा, पाण्यापुरता मर्यादित राहिला नसून जीवापाड जपलेल्या शेत शिवारातील बागा देखील उद्ध्वस्त करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.दोंडाईचा-मालपूर रस्त्याच्या आजुबाजूला मालपूर शिवारातील डाळींब बाग, आवळा बाग व सिताफळ बाग पाण्याअभावी नुसत्या करपल्याच नाहीत तर सुकून गेल्या आहेत. पाण्याचा प्रश्न मालपूरसह परिसरातील गावांमध्ये गंभीर झाला आहे. याचा फटका आता दिर्घमुदतीच्या फळबागा पिकांपर्यंत येऊन पोहाचल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. रानावनात जनावरांचा चारा संपुष्टात आल्याने शेतकरी आधीच हैराण झाले आहे. त्यात वर्षानुवर्ष उत्पन्न मिळवून देणाºया फळबागा देखील डोळ्यादेखत उन्हामुळे खाक झाल्यामुळे आता शेती करायची उमेदच शिल्लक राहिली नसल्याची प्रतिक्रीया शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.यावर्षी तुलनेने कमी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यातील दोन दिवसाचा पाऊस सोडला तर त्यानंतर पाण्याचा थेंबही पडला नाही. गेलेला पाऊस पोळ्याला हमखास येतो, असे  अनुभवी शेतकरी सांगतात. मात्र, यंदा ही अपेक्षाही फोल ठरल्यामुळे विहिरींना पाणीच आले नाही. ओहोळ, लहान मोठे जलयुक्त बंधारे दोन वर्षांपासून कोरडे आहेत. तसेच अमरावती मध्यम प्रकल्पात १४ वर्षांपासून ठणठणाट आहे.शेतकºयांनी सुमारे पाच वर्षांपूर्वी शेकडो हेक्टरवर डाळींब, सिताफळ, आवळा बागांची लागवड करुन जोपासना केली होती. मात्र, यावर्षीच्या दुष्काळात या बाग वाळून गेल्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकºयांनी अगोदर टँकरद्वारे पाणी देऊन या बागा जगविण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, टँकर भरुन आणणे देखील आता शक्य नसल्याने नाईलाजस्तव सोडून द्यावे लागत आहे. डाळींबास कळी लागली. मात्र, डाळींब तयार होण्यास सुरुवात होताच पाणी कमी पडल्याने फळांसह बागा सुकून गेल्या, असे शेतकयांनी सांगितले.

 

टॅग्स :Dhuleधुळे