शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

पाण्याअभावी डाळींब बाग करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 11:48 IST

मालपूर परिसर : उन्हाने गाठला उच्चांक, उद्ध्वस्त झालेल्या बागेमुळे शेतकरी हवालदिल

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातील डाळींबाची बाग पाण्याअभावी करपून गेली आहे. यावर्षी उन्हाने उच्चांक गाठल्याने उष्णतेमुळे बाग पुन्हा बहरेल, याची शक्यताही उरलेली नाही. दुष्काळाच्या झळांची तीव्रता मालपूरसह परिसरात दिवसेंदिवस वाढत असून हा दुष्काळ चारा, पाण्यापुरता मर्यादित राहिला नसून जीवापाड जपलेल्या शेत शिवारातील बागा देखील उद्ध्वस्त करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.दोंडाईचा-मालपूर रस्त्याच्या आजुबाजूला मालपूर शिवारातील डाळींब बाग, आवळा बाग व सिताफळ बाग पाण्याअभावी नुसत्या करपल्याच नाहीत तर सुकून गेल्या आहेत. पाण्याचा प्रश्न मालपूरसह परिसरातील गावांमध्ये गंभीर झाला आहे. याचा फटका आता दिर्घमुदतीच्या फळबागा पिकांपर्यंत येऊन पोहाचल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. रानावनात जनावरांचा चारा संपुष्टात आल्याने शेतकरी आधीच हैराण झाले आहे. त्यात वर्षानुवर्ष उत्पन्न मिळवून देणाºया फळबागा देखील डोळ्यादेखत उन्हामुळे खाक झाल्यामुळे आता शेती करायची उमेदच शिल्लक राहिली नसल्याची प्रतिक्रीया शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.यावर्षी तुलनेने कमी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यातील दोन दिवसाचा पाऊस सोडला तर त्यानंतर पाण्याचा थेंबही पडला नाही. गेलेला पाऊस पोळ्याला हमखास येतो, असे  अनुभवी शेतकरी सांगतात. मात्र, यंदा ही अपेक्षाही फोल ठरल्यामुळे विहिरींना पाणीच आले नाही. ओहोळ, लहान मोठे जलयुक्त बंधारे दोन वर्षांपासून कोरडे आहेत. तसेच अमरावती मध्यम प्रकल्पात १४ वर्षांपासून ठणठणाट आहे.शेतकºयांनी सुमारे पाच वर्षांपूर्वी शेकडो हेक्टरवर डाळींब, सिताफळ, आवळा बागांची लागवड करुन जोपासना केली होती. मात्र, यावर्षीच्या दुष्काळात या बाग वाळून गेल्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकºयांनी अगोदर टँकरद्वारे पाणी देऊन या बागा जगविण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, टँकर भरुन आणणे देखील आता शक्य नसल्याने नाईलाजस्तव सोडून द्यावे लागत आहे. डाळींबास कळी लागली. मात्र, डाळींब तयार होण्यास सुरुवात होताच पाणी कमी पडल्याने फळांसह बागा सुकून गेल्या, असे शेतकयांनी सांगितले.

 

टॅग्स :Dhuleधुळे