शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

‘स्मृतिभ्रंश’च्या केवळ अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 21:50 IST

फॅक्टरी आग प्रकरण : सर्व जवान सुखरुप असल्याची माहिती

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील केमिकल्स फॅक्टरीत झालेल्या स्फोटातील जखमी जवानांची प्रकृती स्थित आहे़ स्मृतीभ्रश झाल्याची केवळ अफवाच आहे़ अशी माहिती राज्य राखीव पोलिस दलाचे समादेश संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली़वाघाडी गावाजवळील केमिकल्स फॅक्टरीत झालेल्या स्फोटात १४ ठार तर ७२ जण जखमी झाले होते़ याप्रकरणी रूमीत केमिसिंथ (केमिकल्स) प्रा़लि़ कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यात आला असला तरी अद्याप कुणालाच अटक करण्यात आलेली नाही़ ३१ आॅगस्ट रोजी सकाळी झालेल्या स्फोटात १३ जणांचा जागीच मृत्यु तर ७२ जण जखमी झाले होते़ घटनेच्या तिसऱ्या दिवशी बेपत्ता असलेल्या एकाचा मृतदेह कंपनीपासून ५०० मिटरवर असलेल्या नाल्याच्या किनारी सापडला होता़ त्यामुळे या घटनेत एकूण १४ जणांचा मृत्यु झाला आहे़ अद्यापही अनेक जखमी कामगार उपचार घेत आहेत़ कंपनीतील एका कामगारानेच या घटनेत कंपनी व्यवस्थापन जबाबदार असून त्यांचे हलगर्जी व निष्काळजीपणामुळेच सदरची घटना घडली़ त्यामुळे कंपनी व्यवस्थापन विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहेग़ुन्हा नोंदवून देखील ११ दिवस उलटले तरी पोलिसाकडून काहीच कारवाई झालेली नाही़ नेमके कशामुळे ही घटना घडली ते देखील अनुत्त्तरीतच आहे़ घटना घडल्यानंतर तेथील केमिकल्सचे ड्रम व पावडर अन्यथा हलविण्यात आले आहे़ सद्यस्थितीत तेथे वॉचमन वगळता कुणाही नाही़ दरम्यान, आमदार अमरिशभाई पटेल यांनी पटेल परिवाराकडून मृतांना प्रत्येकी ६० हजार रूपयांची आर्थिक मदत, जखमींना किराणा माल तर अनाथ झालेल्या पाल्यांचे शिक्षण व राहण्याचा सर्व खर्च करण्याचे जाहिर केले आहे़ रूमित केमिकल्स फॅक्टरी प्रशासनाने सुध्दा मृतांच्या कुटुंबासाठी तातडीची मदत म्हणून प्रत्येकी रोख २५ हजार रूपये दिलेत तर त्यांच्या वारसांना पुन्हा ५ लाख रूपयांचा निधी नुकताच तहसिल प्रशासनाच्या उपस्थितीत देण्यात आला़वाघाडीतील आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेले सर्व जवान सुखरूप आहेत़ स्मृतीभ्रंश वगैरे झाल्याची कोणतीही घटना घडलेली नाही़-संजय पाटील,राज्य राखीव पोलिस दल, समादेशक