शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पुस्तकांशिवाय भरली ऑनलाइन शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. दरवर्षी १५ अथवा १६ जूनलाच जिल्ह्यातील शाळा सुरू ...

सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. दरवर्षी १५ अथवा १६ जूनलाच जिल्ह्यातील शाळा सुरू होत असतात. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना मोफत पुस्तकांचे वाटप केले जाते. नवीन पाठ्यपुस्तके मिळाल्याने, विद्यार्थी आनंदित होत असतात. पहिल्या दिवसांपासूनच शिक्षणाला सुरुवात होते. मात्र, या वर्षी शाळा सुरू होऊन २८ दिवस झाले, तरी अद्याप विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळाली नाहीत. शाळा सुरू नसल्या, तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, पुस्तकेच नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेण्यात विद्यार्थ्यांना अडचण येत आहे.

जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतचे सुमारे अडीच लाख विद्यार्थी असून, त्यांच्यासाठी १२ लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची गरज आहे. त्यामुळे लवकर पुस्तके मिळावीत, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या दिवशीच विद्यार्थ्यांना पुस्तके मिळत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत होता.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वर्षीही ऑनलाइन शिक्षण सुरू झालेले आहे. मात्र, अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकेच मिळालेली नाही.

शिक्षण विभागाने जुनी पुस्तके परत करण्याचे आवाहन केले होते. त्याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

शाळा सुरू होऊन महिना होत आला. मात्र, अद्याप पुस्तके हाती मिळालेले नाही. त्यामुळे अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

- भूषण पाटील, विद्यार्थी.

मोबाइल असला, तरच ऑनलाइन अभ्यास करता येतो. मात्र, मोबाइल नसला की, पुस्तकांशिवाय पर्याय नाही. पुस्तके मिळणे गरजेचे आहे.

-भाग्यश्री देव, विद्यार्थिनी