शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कांदा ३०० रुपयांनी गडगडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:07 IST

पिंपळनेर : उपबाजार समितीत २५० वाहनांचा लिलाव, दर कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री तालुक्यातील पिंपळनेर उपबाजार समितीत शुक्रवारी कांद्याच्या २५० वाहनांचा लिलाव झाला. यावेळी कांद्याला १४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांद्याचे दर पुन्हा कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली. आता दोन दिवस मार्केट बंद राहणार असून सोमवारी मार्केट पुन्हा सुरू होईल.पिंपळनेर उपबाजार समितीत गुरुवारी लिलावासाठी मोठ्या प्रमाणात कांद्याची वाहने दाखल झाली होती. लिलावावेळी पाऊस येत असल्याने व वाहनांची संख्या प्रचंड असल्याने व्यापाºयांनी ४०० वाहनांचा लिलाव करून उर्वरित वाहनांचा शुक्रवारी लिलाव केला जाईल, असे सांगितले. यावेळी व्यापारी, शेतकरी व बाजार समिती प्रशासनाशी यावर चर्चा होऊन देखील लिलाव झाला नाही. यामुळे काही शेतकºयांनी आपली वाहने पुन्हा परत नेली तर काही शेतकरी बाजार समितीच्या आवारात रात्रभर कांद्याची वाहने उभी करून थांबले होते. यातील उर्वरित वाहनांचा लिलाव शुक्रवारी करण्यात आला. यावेळी २५० वाहने दाखल झाली होती. कांद्याला प्रतिक्विंटल १४०० रुपयांपर्यंत भाव देण्यात आला तर सरासरी ११०० ते १३०० असा भाव होता.कोरोनामुळे वेळोवेळी लॉकडाऊन व साठवलेला कांदा चाळीत सडू लागल्याने यावर्षी शेतकºयांना मोठा आर्थिक फटका कांद्यात बसला आहे. त्यात गेल्या ८ दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, ही वाढ अल्पकाळ राहिली. त्यामुळे शेतकºयांच्या नशिबी निराशाच आली. कोरोना आजारामुळे शेतकºयांची आर्थिक बजेट कोलमडले असून उर्वरित कांद्याला २० रुपये तरी भाव मिळावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकºयांनी केली होती. राज्य व केंद्र सरकार या मागणीकडे अद्यापही लक्ष देतांना दिसत नाही.शुक्रवारी बाजार समितीत कर्मचाºयांचा संप होता. मात्र, गुरुवारी पूर्ण लिलाव न झालेल्या वाहनांचा लिलाव शेतकºयांचे हित लक्षात घेऊन करण्यात आला. व्यापाºयांनीही सहकार्य केल्याने हा लिलाव झाल्याची माहिती सचिव अशोक मोरे व शाखा प्रमुख संजय बावा यांनी दिली.