शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:39 IST

धुळे : जिल्ह्यातील कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असून शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची ...

धुळे : जिल्ह्यातील कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असून शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांनी नुकतेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने कांदा, कापूस इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे कांदा, कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. कांद्याची रोप लागवड, खर्च, खते, फवारणी व निंदणीचा खर्चही निघेनासा झाला आहे. तसेच कापसाच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. कापसाच्या कैऱ्या, बोंडे लालसर व काळे पडत आहेत. यामुळे माेठे नुकसान झाले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आपचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, साेशल मीडियाप्रमुख पीयूष शिंदे, महारु पाटील, देविदास माळी, महेश वाघ, अनिल पवार, सोमेश्चर खलाणे, भगवान कोळी, दत्तात्रय पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.