शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभर शाळा गजबजल्याच नाही, ॲानलाईन शिक्षणाचाही खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:38 IST

कोरोनामुळे मार्चपासूनच एक-एक गोष्टींवर निर्बंध येऊ लागले. अगोदर जनता कर्फ्यू नंतर लाॅकडाऊन झाले. त्यामुळे दहावीचा बोर्डाचा इतिहास-नागरिक शास्त्राचा पेपर ...

कोरोनामुळे मार्चपासूनच एक-एक गोष्टींवर निर्बंध येऊ लागले. अगोदर जनता कर्फ्यू नंतर लाॅकडाऊन झाले. त्यामुळे दहावीचा बोर्डाचा इतिहास-नागरिक शास्त्राचा पेपर रद्द करावा लागला. दहावीचा पेपर रद्द होण्याची ही पहिलीच वेळ होती.

दरम्यान, दहावीचा पेपर रद्द होऊ शकतो, तर इतर इयत्तांच्या परीक्षांचे काय होणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. त्यामुळे पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षाच झाल्या नाही. विना परीक्षा देता केवळ सहामाही परीक्षेच्या सरासरी गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला.

दरवर्षी १५ अथवा १६ जूनपासून जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असते. मात्र, कोरोनामुळे यावर्षी जूनमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवातच झाली नाही. त्यामुळे शाळांची घंटा वाजली नाही, शाळांमध्ये किलबिलाटही ऐकू आला नाही.

दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने ॲानलाईन शिक्षण सुरू केले. मात्र, याचा पूर्णत: खेळखंडोबा झाला. शहरी भागातील विद्यार्थ्यांना चांगल्यापैकी ऑनलाईन शिक्षण मिळाले. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नावालाच ऑनलाईन शिक्षण मिळाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

ग्रामीण भागात बहुतेकांकडे एकच स्मार्ट फोन. त्यातही रेंजची अनुपलब्धता असल्याने, चिमुरड्यांना ऑनलाईन शिक्षण मिळूच शकले नाही. विशेष म्हणजे कोचिंग क्लासही सुरूच झाले नाही.

दरम्यान, महाविद्यालयांचीही यापेक्षा वेगळी स्थिती राहिलेली नाही. दहावीचा निकाल लागला तरी अकरावीचे वर्ग लवकर सुरू झाले नाही. त्यामुळे या वर्षात विद्यार्थी शिक्षणाला मुकले होते.

शाळा सुरू झाल्या तरी फारसा उपयोग नाही

नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे बघून राज्य शासनाने पुन्हा शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला तरी जिल्ह्यात मात्र त्यासाठी ७ डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. त्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू झाले. शाळा सुरू झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० टक्केच हेाती. मात्र, कोरोनाची धास्ती असल्याने अनेक पालकांनी संमतीपत्र भरून दिलेच नाही. ५० टक्क्यांच्या उपस्थितीने शाळा सुरू झाल्या तरी त्यापेक्षाही कमीच उपस्थिती होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात काही शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने त्या शाळाही बंद करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली होती. त्यामुळे हे शैक्षणिक वर्ष म्हणजे केवळ ‘रेस्ट इयर’ ठरले. शिक्षणात कोणीही गांभीर्य दाखविले नाही.