शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बहुतांशी ग्रामपंचायत सदस्य सहलीला, ११ व १२ रोजी सरपंच-उपसरपंच निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST

गेल्या महिन्यातच तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असली तरी सरपंचपदाची निवडणूक अद्याप झालेली नसल्याने गावोगावी राजकीय वातावरण तापत ...

गेल्या महिन्यातच तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असली तरी सरपंचपदाची निवडणूक अद्याप झालेली नसल्याने गावोगावी राजकीय वातावरण तापत आहे़ अशातच आता तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींची ११ रोजी तर उर्वरित १७ ग्रामपंचायतींची १२ रोजी सरपंच-उपसरपंच पदाच्या निवड प्रक्रियेसाठी पहिली सभा घेण्यात येणार आहे़ यासाठी अव्वल कारकून व मंडळ अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून निवड झाली आहे़

सरपंच पदाचे आरक्षण २८ जानेवारी रोजी तर महिला सरपंच पदाचे आरक्षण २ फेब्रुवारी रोजी काढण्यात आले़ तालुक्यातील ३४ पैकी काही गावातील सदस्य मतमोजणी झाल्यापासून लगेच फिरायला निघून गेले आहेत़ लवकरच निवड होईल या अपेक्षेने ते होते़ अद्यापही ते परतलेले नाहीत़ तशातच पुन्हा महिला आरक्षणाच्या दिवशी काही सदस्य देखील फिरण्यासाठी निघून गेले आहेत़ फिरण्यासाठी गेलेले सदस्य अद्याप परतले नसले तरी त्यांना ११ तारखेची वाट पाहावी लागणार आहे़ विशेषत: काही गावात सरपंच निवड अटीतटीची होणार असल्यामुळे ते सदस्यही देवदर्शनाला निघून गेले आहेत़

काही गावांमध्ये एका पॅनलला बहुमत असले तरी सरपंचपदाचा उमेदवार अन्य विरोधी पॅनलजवळ असल्याने फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे़ याकरिता गावागावांत राजकीय गावपुढारी व पॅनलप्रमुख दैनंदिन घडामोंडीवर लक्ष ठेवून तशा हालचाली गतिमान करीत आहेत़

सरपंच निवड

११ रोजी असली, बलकुवे, कुवे, घोडसगांव, चाकडू, बाळदे, वाठोडे, होळ, हिंगोणी बु़, उप्परपिंड, दहिवद, नटवाडे, कळमसरे, जामन्यापाडा, हिंगोणीपाडा, गरताड, पिंपळे तर १२ फेब्रुवारी रोजी भटाणे, भाटपुरा, साकवद, जातोडा, टेकवाडे, बोरगांव, जुने भामपूर, भावेर, मांडळ, वरूळ, विखरण, शिंगावे, भोरखेडा, सावळदे, बाभुळदे, जवखेडा, शेमल्या या गावांचा समावेश आहे़