शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

प्रत्येक गरिबाला देऊ किमान उत्पन्न : गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 05:32 IST

सभेला नाशिक, नंदुरबार, जळगाव व धुळे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धुळे : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आली तर देशातील सर्व गरीब नागरिकांना किमान उत्पन्नाएवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे धुळे येथे झालेल्या सभेत केली.

सभेला नाशिक, नंदुरबार, जळगाव व धुळे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र असलेल्या २५ उद्योगपतींचा भारत एकीकडे, तर सामान्य शेतकरी, बेरोजगारांचा भारत दुसरीकडे आहे. काँग्रेसला एकसंघ भारत हवा आहे. आश्वासनाची अंमलबजावणी हा काँग्रेसचा इतिहास आहे.काँग्रेसची विचारधारा देशाला आणि समाजाला जोडण्याची आहे. ही विचारधारा महाराष्ट्तरा सर्वात जास्त आहे. काँग्रेसची सुरुवात महाराष्ट्रातूनच झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचया जनतेचे आभार मानतो. आम्ही राज्यात राष्ट्रवादीसोबत लोकसभा निवडणूक लढवित आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, पिकाला हमीभाव मिळाला का?, असा प्रश्न त्यांनी विचारला.

महाआघाडी झाली पाहिजेप्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत महाआघाडी स्थापन झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. राष्टÑवादीशी आघाडी झाली आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांना चार जागा देऊ केल्या आहे. सीपीएम, शेकाप, खासदार राजू शेट्टी यांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. हे सर्व ७० टक्के विखुरलेले मतदान एकवटले तर त्याचा फायदा महाआघाडीला मिळेल, असेही चव्हाण म्हणाले.

बेरोजगारांना रोजगार देऊआम्ही देशातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देऊ. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात सत्ता येताच आश्वासनाची पूर्ती करीत आमच्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या दोन दिवसांत कर्जमाफी लागू केली, याची आठवण राहुल गांधी यांनी करुन दिली.रोजगारात चीनपेक्षा मागेदेशात २४ तासांत केवळ ४५० बेरोजगारांना रोजगार मिळतो. त्या तुलनेत चीन २४ तासात २४ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देतो. आपल्याला चीनशी बरोबरी करावी लागेल. आज आपण प्रत्येक वस्तुवर मेड इन चायनाचे लेबल पाहतो. ते बदलून त्या जागी मेड इन इंडिया, मेड इन महाराष्टÑ असे लेबल असलेल्या वस्तू आणाव्या लागतील. तेव्हाच चीनच्या बरोबरीने भारतातील बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल. ते आम्ही करुन दाखवू, असे राहुल गांधी म्हणाले.