शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:42 IST

भूषण चिंचोरे धुळे - कोरोनाकाळानंतर समाजातील अनेकांना विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागते आहे. यामुळे ताणतणाव वाढून कलह निर्माण झाले ...

भूषण चिंचोरे

धुळे - कोरोनाकाळानंतर समाजातील अनेकांना विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागते आहे. यामुळे ताणतणाव वाढून कलह निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत संवाद ठेवणे महत्त्वाचा आहे. संवादाची दरी निर्माण झाली तर मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड, आर्थिक नुकसान व एकाकी पडल्याने नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. नैराश्य घालवण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी यांच्याशी मनमोकळा संवाद साधणे आवश्यक आहे.

मन हलके करणे हाच उपाय

- कोरोनाच्या काळात नेहमीपेक्षा जास्त संपर्क आल्याने समायोजन करणे कठीण गेले.

- बेरोजगारी व आर्थिक संकटे आल्याने नैराश्य व चिंतेचे विकार वाढले आहेत.

- मन हलके करणे, व्यक्त होणे हाच यावरच उत्तम उपाय आहे.

- कुटुंबातील सदस्य, सहकारी व मित्रांशी मनमोकळा संवाद साधला पाहिजे.

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

नोकरी गेल्यामुळे व आर्थिक संकटांमुळे घरा-घरात कलह वाढले आहेत. तसेच घरातच राहिल्याने नेहमीपेक्षा अधिक संपर्क आल्यानेही एकमेकांना समजून घेणे कठीण गेले. एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. संवाद वाढवणे आवश्यक आहे.

- डॉ. तुषार भट, मानसोपचार तज्ज्ञ

कोरोनानंतर नैराश्य वाढले आहे. त्यामुळे व्यसनाधीनतादेखील वाढली आहे. त्यामुळे कलह निर्माण झाले आहेत. निराशा वाटत असेल तर जवळच्या व्यक्तींशी बोलणे, मन मोकळे करणे गरजेचे आहे. गरज भासली तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.

- डॉ. जीवन पवार, मानसोपचार तज्ज्ञ