शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:42 IST

भूषण चिंचोरे धुळे - कोरोनाकाळानंतर समाजातील अनेकांना विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागते आहे. यामुळे ताणतणाव वाढून कलह निर्माण झाले ...

भूषण चिंचोरे

धुळे - कोरोनाकाळानंतर समाजातील अनेकांना विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागते आहे. यामुळे ताणतणाव वाढून कलह निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत संवाद ठेवणे महत्त्वाचा आहे. संवादाची दरी निर्माण झाली तर मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड, आर्थिक नुकसान व एकाकी पडल्याने नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. नैराश्य घालवण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी यांच्याशी मनमोकळा संवाद साधणे आवश्यक आहे.

मन हलके करणे हाच उपाय

- कोरोनाच्या काळात नेहमीपेक्षा जास्त संपर्क आल्याने समायोजन करणे कठीण गेले.

- बेरोजगारी व आर्थिक संकटे आल्याने नैराश्य व चिंतेचे विकार वाढले आहेत.

- मन हलके करणे, व्यक्त होणे हाच यावरच उत्तम उपाय आहे.

- कुटुंबातील सदस्य, सहकारी व मित्रांशी मनमोकळा संवाद साधला पाहिजे.

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

नोकरी गेल्यामुळे व आर्थिक संकटांमुळे घरा-घरात कलह वाढले आहेत. तसेच घरातच राहिल्याने नेहमीपेक्षा अधिक संपर्क आल्यानेही एकमेकांना समजून घेणे कठीण गेले. एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. संवाद वाढवणे आवश्यक आहे.

- डॉ. तुषार भट, मानसोपचार तज्ज्ञ

कोरोनानंतर नैराश्य वाढले आहे. त्यामुळे व्यसनाधीनतादेखील वाढली आहे. त्यामुळे कलह निर्माण झाले आहेत. निराशा वाटत असेल तर जवळच्या व्यक्तींशी बोलणे, मन मोकळे करणे गरजेचे आहे. गरज भासली तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.

- डॉ. जीवन पवार, मानसोपचार तज्ज्ञ