शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

सदस्याला मिळतात अवघे २०० रुपये, मात्र त्यासाठी लाखोंची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST

ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाचा श्रीगणेशा करणारा कार्यकर्ता स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी किती मोजेल, याचा काही नेम नाही़ ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या ...

ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाचा श्रीगणेशा करणारा कार्यकर्ता स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी किती मोजेल, याचा काही नेम नाही़ ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या अति प्रतिष्ठेची बनली आहे़ त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या सर्व नेत्यांचे या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष असते़ अलीकडच्या निवडणुकीत होणाऱ्या वारेमाप खर्चामुळे निवडणूक म्हटले की, सामान्य कार्यकर्त्याला धडकी भरते़ त्यामुळे गटाला उमेदवार मिळविताना गटनेत्यांचाच कस लागतो़ पाचशे - हजारांच्या प्रभागात लाखोंची उधळपट्टी करावी लागते़

गावच्या विकासाचा कणा असणाऱ्या ग्रामपंचायतींवर आपली सत्ता असली की, गटनेत्यांचे राजकारणाबरोबर अर्थकरण साधते़ त्यासाठी गटनेते आपली प्रतिष्ठा पणाला लावतात़ ग्रामपंचायतीच्या सदस्याने दरमहा हजेरी लावली तर २०० रुपये मानधन मिळते़ वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या मर्जीने निधी मिळाला तर गावातील प्रभागाचा विकास, अन्यथा सारा गाव भकास़ सरकारी योजनांचा कारभार गटनेत्यांच्या मर्जीतील सदस्याला मिळावा यासाठी चढाओढ सुरूच असते़ यातूनच सदस्यांमध्ये ५ वर्षे कुरबुरी, नाराजी वाढते़ त्याचा फटका निवडणुकीत मोजावा लागतो़ अनेक सदस्य मासिक सभेची उपस्थिती सोडाच, गावसभेत बोलताना दचकतात़ सदस्य म्हणून निवडून आलेला कार्यकर्ता गावात पुढारी म्हणून मिरविण्यापुरता उरतो़ सत्तेत सहभागी नसणाऱ्या सदस्यांची अवस्था म्हणजे असून घोटाळा नसून खोळंबा अशीच असते म्हणून सत्तेसाठी वाटेल त्या स्तराला जाण्याची प्रवृत्ती अलीकडे बळावत आहे़

सामान्य उमेदवारांची अडचण

सध्या ग्रामीण निवडणुकीतदेखील वारेमाप पैसा खर्च करावा लागत असल्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विजयी होताना अनेक अडचणी येतात़ तालुक्यातील अनेक गावांमध्ये फारसे पैसे खर्च न करतादेखील काही उमेदवार विजयी झाले आहेत़ विकासाची कामे करणाऱ्या उमेदवारांना कौल दिला जात असतो़