शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

खरीपासाठी बाजारात लगबग वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:03 IST

बीटी कपाशीला प्राधान्य : बियाण्यांच्या चौकशीसह खरेदीसाठी शेतकरी बाजारात

धुळे : जिल्ह्यात एकीकडे टंचाई तीव्र झालेली असताना दुसरीकडे बाजारात आगामी खरीप हंगामासाठीची लगबग वाढत चालली आहे. आवंटनानुसार प्राप्त झालेल्या बीटी बियाण्याच्या किमतीची चौकशी, खरेदीसाठी बाजारात शेतकºयांची गर्दी होऊ लागली आहे. तसेच बीटीव्यतिरिक्त अन्य कपाशी व पिकांच्या वाणाचीही माहिती त्यांच्याकडून घेण्यात येत असल्याने सर्वांना पावसाचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात कपाशीची होणारी लागवड लक्षात घेऊन यावर्षी बीटी कपाशी बियाण्यांची ११ लाख ६३ हजार पाकिटे मंजूर झालेली असून त्यानुसार टप्प्याटप्प्याने पुरवठा यापूर्वी सुरू झाला आहे. सर्वच शेतकरी एकाच वेळी लागवड करत नाही. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहेत असे मोजके शेतकरी पूर्वहंगामी लागवड (धूळपेरणी) करतात. पण बहुतांश शेतकºयांकडे कोरडवाहू शेती असल्याने त्यांना पावसाची प्रतीक्षा करण्यावाचून गत्यंतर नसते. त्यामुळे मागणीएवढी पाकिटे वेळेत उपलब्ध होतील, असा विश्वास कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बीटी बियाणे २५ मेपूर्वी विक्री न करण्याच्या सूचना कृषीनिविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कंपन्यांकडून पुरवठा सुरू होताच शनिवारनंतर विक्री सुरू केली आहे. रविवारी बाजारपेठ बंद असतांनाही बियाणे घेण्यास आलेल्या शेतकºयांची गर्दी दिसून आली. कपाशीखालील क्षेत्र वाढणार  यंदा जिल्ह्यात खरिप हंगामांतर्गत एकूण ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित करण्यात आलेली आहे. त्यापैकी २ लाख ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होणे अपेक्षित आहे. जोरदार व नियमित पाऊस झाल्यास ही लागवड अडीच लाख हेक्टर क्षेत्राचा आकडा गाठेल, असा अंदाज आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी दरवर्षी कपाशीला प्राधान्य देत असल्याने दरवर्षी त्याखालील क्षेत्रात वाढ होत असून दुष्काळामुळे आहे. यंदा दुष्काळामुळे पूर्वहंगामी कपाशी लागवडीचे प्रमाण नगण्य राहील, अशी शक्यता आहे. बीटी कपाशी व्यतिरिक्त बाजरी, ज्वारी, तूर, मका आदी पिकांचे बियाणेही या महिन्याअखेरपर्यंत होईल, असे सांगण्यात आले. शेतकरी कृषीनिविष्ठा केंद्रांवर जाऊन अपेक्षित बियाणे उपलब्धता, त्याची किंमत याबाबत चौकशी करत आहेत. काही खरेदी करत आहेत. तर काही शेतकरी पाऊस झाल्यानंतर बियाणे खरेदी करतील, असे कृषीनिविष्ठा विक्रेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना आवर्जून सांगितले. 

कृत्रिम टंचाईचा संभव 

या संदर्भात बाजारात कानोसा घेतला असता बीटी कपाशीत राशी-२ ला शेतकºयांकडून मागणी होते. परंतु त्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे कृत्रिम टंचाई जाणवण्याचा संभव आहे. त्यामुळे कृषी विभागाने खबरदारी घेऊन संबंधित कंपन्यांना मागणीनुसार एकाचवेळी पुरवठा करण्याबाबत सूचना करावी, अशी मागणी होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व शेतकरी एकाचवेळी लागवड करत नसले तरी ते बियाणे खरेदी करून ठेवतात. मात्र शेतकºयांनी एका विशिष्ट वाणाची मागणी करू  नये, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे