शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

कोरोनाकाळात उच्च रक्तदाब असलेल्या तब्बल ७३ रुग्णांनी गमवला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:26 IST

वयाची सत्तरीपार केलेल्या रुग्णांना अधिक धोका जिल्ह्यासह महानगरात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. या ...

वयाची सत्तरीपार केलेल्या रुग्णांना अधिक धोका

जिल्ह्यासह महानगरात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. या कालावधीत ६० ते ७० वयोगटातील ८२ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, तर ५१ ते ६० वयोगटातील ७९ रुग्ण आहेत. याच कालावधीत २१ ते ३० वयोगटातील तब्बल पाच तरुणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

पाहिल्या लाटेतील ऑगस्ट, तर दुसऱ्या लाटेतील एप्रिल महिन्यात सर्वाधिक मृत्यू

जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. पहिल्या लाटेत रुग्णांमध्ये घशात दुखणे, खोकला, सर्दी तसेच ताप अशी लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे रुग्णाला तातडीने उपचार घेण्यासाठी वेळ मिळत होता. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मर्यादित होती. या पहिल्या लाटेत मार्च ते जून २०२० या कालावधीत ६२५ कोरोनाबाधित, तर ३० रुग्णांचा मृत्यू झालेला होता. जुलै महिन्यात ५११ रुग्ण, २८ मृत्यू तर ऑगस्ट महिन्यात तब्बल दोन हजार ३४३ रुग्ण व ६० रुग्णांचा मृत्यूचा आकडा पार केला होता. त्यानंतर पहिल्या लाटेचे प्रमाण हळूहळू कमी झाल्याने सप्टेंबर महिन्यात दोन हजार ७८ रुग्ण बाधित, तर ४२ रुग्णांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर अशा दोन महिन्यात केवळ सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होतो. त्यानंतर जानेवारी महिन्यापासून दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येण्याचे प्रमाण कमी झाल्याने बाधित प्रमाणात वाढ होऊन मृत्युसंख्यादेखील झपाट्याने वाढू लागली आहे. शासकीय आकडेवारीनुसार जानेवारी २०२१ महिन्याभरात १८७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते तर दोन जणांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ७७७ बाधित आढळले होते तर मार्च व एप्रिल या दोन महिन्यात महानगरात सहा हजार ५९४ बाधितांमध्ये ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.