शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

एम. एस्सी.चे वर्ग सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:49 IST

जि. प.ची १ रोजी सर्वसाधारण सभा धुळे : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दिनांक १ मार्च ...

जि. प.ची १ रोजी सर्वसाधारण सभा

धुळे : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दिनांक १ मार्च रोजी दुपारी २ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डाॅ. तुषार रंधे असतील. आता ही सभा ॲानलाईन होणार की ॲाफलाईन, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सभेच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

वीजबिल भरण्याची ग्राहकांना चिंता

धुळे : महावितरण कंपनीने थकीत वीजबिलांची वसुली सुरू केल्याने, थकबाकीदार ग्राहकांचे धाबे दणाणले आहे. पाच-सहा महिन्यांचे बिल एकदम कसे भरावे, याची अनेकांना चिंता लागली असून, वीजबिलात सवलत देण्याची मागणी होऊ लागली आहे.

खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे

धुळे : खरिपाचा हंगाम अद्याप लांब असला तरी जमिनीची प्रत, पाण्याची उपलब्धता या अनुषंगाने शेतकऱ्यांनी कोणती पिके घेतली पाहिजेत, याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पारंपरिक ऐवजी कमी खर्चात जास्त उत्पादन येऊ शकेल, अशा पिकांविषयी सल्ला देणे गरजेचे आहे.

रस्त्यावर आलेल्या काटेरी फांद्या तोडाव्यात

धुळे : शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय ते संतोषी माता मंदिर दरम्यानच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला काटेरी झुडपांच्या फांद्या वाढलेल्या असून, त्या वाहनधारकांना लागत असतात. या फांद्या तोडण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भाज्यांची आवक घटली, दर वधारले

धुळे : उन्हाळ्याची चाहुल लागताच गेल्या काही दिवसांपासून येथील भाजी मार्केटमध्ये होणारी पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटली आहे. परिणामी भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. अनेकांनी आतापासूनच डाळी खरेदीला प्राधान्य दिले आहे.

पॅसेंजर सुरू होत असल्याने समाधान

नरडाणा : रेल्वे विभागाने येत्या १ मार्चपासून सुरत-भुसावळ मार्गावर पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने, प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कारण पॅसेंजर गाडीच नसल्याने, प्रवाशांना प्रवासासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती.

ग्रामीण भागात अजूनही उदासिनता

पिंपळनेर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शहरात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होत असली तरी ग्रामीण भागात नियम पाळण्याबाबत उदासिनता दिसून येते. त्यामुळे प्रशासनाने ग्रामीण भागातही लक्ष देण्याची गरज आहे.