शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात आठवेळा लॅाकडाऊन,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:38 IST

लाॅकडाऊन जाहीर होण्यापूर्वी जिल्ह्यातील आठवडी बाजार तसेच चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर शाळा, महाविद्यालयेही बंद करण्यात ...

लाॅकडाऊन जाहीर होण्यापूर्वी जिल्ह्यातील आठवडी बाजार तसेच चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर शाळा, महाविद्यालयेही बंद करण्यात आली. तसेच सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली होती. मात्र २३ रोजी संपूर्ण लाॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार ठप्प पडले होते. यावेळी स्थलांतरित कामगारांसाठी निवारा उभारण्यात आला. तर शासकीय कर्मचाऱ्यांनाही मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले. लॅाकडाऊनचा २१ दिवसांचा कालावधी ११ एप्रिलला संपला. मात्र संसर्ग वाढत असल्याने, पुन्हा लॅाकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला होता. यानंतर ३१ मे पर्यंत वेळोवेळी लॅाकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला होता. या कालावधीत पेट्रोल पंपही सकाळी सकाळी ६ ते दुपारी २ या वेळेतच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. लाॅकडाऊन असले तरी खरीप हंगामासाठी शेतीला परवानगी देण्यात आली होती. तसेच बियाणे, खत विक्रीची दुकाने सुरूच होती.

केंद्र सरकारने १ जूनपासून अनलाॅकची प्रक्रिया सुरू केलेली असली तरी मात्र राज्यात अनलॅाक होण्यासाठी २७ जूनपर्यंत वाट पहावी लागली. २७ जून २० पासून मुख्यमंत्र्यांनी ‘मिशन बिगिन’ सुरू केले. त्यानंतर केशकर्तनालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर ३ जुलैपासून सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने व्यापारी वर्गात समाधान व्यक्त करण्यात आले. त्यानंतर ७ जुलैपासून हॅाटेल्स, लॅाज, गेस्ट हाऊस हे ३३ टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी मिळाली होती. कोरोनाचा संसर्ग थोडा कमी झाल्याचे वाटून दुकाने सुरू ठेवण्याची वेळ मर्यादा सायंकाळी सहापर्यंत करण्यात आली.

दरम्यान, या कालावधीतही जिल्हावासीयांना १४ वेळा संचारबंदीला सामोरे जावे लागले. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या आठवड्यातच तब्बल ६० तासांचा जनता कर्फ्यू लावण्यात आलेला होता.

लॅाकडाऊन, जनता कर्फ्यू यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ते भरून निघणे अशक्यच आहे.