शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

चिकसे येथे बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:10 IST

पिंपळनेर : दोन बोकड, दोन मेंढ्यांचा पाडला फडशा, भितीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री तालुक्यातील चिकसे शिवारात सोमवारी पहाटे बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात बिबट्याने घराजवळील गोठ्यातील दोन बोकड, दोन मेंढया अशा चार जनावरांचा फडशा पाडला. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, तसेच लवकरच वनविभागामार्फत पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.गावातील बापूजी त्र्यंबक अहिरे यांच्या घराजवळील वाडयातील गोठयात वन्यप्राण्याने हल्ला करीत तेथे बांधलेले दोन बोकड, दोन शेळ्यांचा फडशा पाडला. हा हल्ला बिबट्याने केल्याचा अंदाज वनविभागाने केलेल्या पाहणीनंतर वर्तविला. वन्यप्राणी रहिवासी भागात येऊन हल्ला करीत असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अहिरे हे पहाटे साडेतीन वाजता उठले असता, त्यांना बोकड, बकºया मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती पंचायत समिती सदस्य अजय सूर्यवंशी यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण माळके, कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा केला. ११ आॅगस्ट रोजीही ताराचंद्र पाताळपुरे यांच्या गांगेश्वर शिवारात गाय, म्हैस, वासरे यांच्यावर बिबट्याने हल्ला करीत त्यांना ठार केल्याची घटना घडली होती. याच शिवारातील मातोश्री पोल्ट्री फार्मवरही बिबटयाने हल्ला करीत कोंबड्या खाण्याचा प्रयत्न केला. मात्र जाळीमुळे ते शक्य झाले नाही. तरीही बिबट्याने जाळीवर पंजा मारल्याने भीतीने व आपसात चेंगरून ३८० कोंबड्या मृत झाल्या होत्या. ही घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली होती. सातत्याने हल्ल्याचे प्रकार घडत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावून शिवार भयमुक्त करण्याची मागणी केली जात आहे. यापूवीर्ही साक्री तालुक्यातील चिकसे, सामोडे, कासारे, कड्याळे, देशशिरवाडे, शेलबारी आदी भागात बिबटयाचा मुक्तसंचार नित्याचाच झाला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी या भागात बिबटयाच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत. नियमित घडणाºया अशा प्रकारच्या घटनांमुळे शेतकरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मागणी करूनही पिंजरा लावण्यात आला नाही. त्यामुळे वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.