शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अमरावती प्रकल्पाला गळती, पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:37 IST

एप्रिल, मे महिन्यातील कडाक्याचे ऊन पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व किती आहे, याची जाणीव करून देते. घोटभर पाण्यासाठी जिवाची लाही ...

एप्रिल, मे महिन्यातील कडाक्याचे ऊन पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व किती आहे, याची जाणीव करून देते. घोटभर पाण्यासाठी जिवाची लाही लाही होत असते, तर हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात मालपूरकरांनी रानोवन भटकंती दोन वर्षांपूर्वी केली होती. ही सर्व उदाहरणे ताजी असताना डोळ्या देखत हे पाणी दररोज वाहून जाताना सर्वसामान्यांचा जीव कासावीस होत आहे. तर पाटबंधारे विभागाला याचे कुठलेही सोयरसुतक दिसून येत नाही.

मालपूर परिसरातील पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी हा एकमेव प्रकल्प आहे. हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर गाव शिवारातील तसेच तालुक्यातील विखरण तलाव भरण्यासाठी पाणी सोडले जाते. मागील वर्षी तुलनेने कमी पर्जन्यमान झाले तरी हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला याला मुख्य कारण पाण्याची केलेली बचत. अन्यथा येथे आज खडखडाट राहिला असता. विखरण तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्याचा प्रश्नच आला नसता. कारण आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. म्हणून शिंदखेडा तालुक्यातील पश्चिम भागातील प्रत्येक नागरिकाने या पाण्याच्या बचतीकडे लक्ष दिले पाहिजे, तरच पावसाळ्यात पाणी सोडण्यासाठी प्रकल्पावर धाव घेता येईल. यामुळे लहान लहान बंधारे भरता येतात व विहिरींना त्यामुळे त्वरित पाझर फुटून शेतशिवार हिरवेगार दिसून येते. या बंधाऱ्याची साठवणूक क्षमता कमी असल्यामुळे लगेच कोरडे होतात. या बंधाऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी अमरावती मध्यम प्रकल्पात पाणी असणे गरजेचे आहे. यासाठी ही पाण्याची बचत करणे खूप आवश्यक आहे अन्यथा धरण उशाला व कोरड घशाला लागेल.

या प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांच्या मुख्य वितरिका, मुख्य सांडव्यामधून बेसुमार पाणी गळती दिसून येत आहे. ही गळती थांबविण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी देखील पावले उचलली पाहिजेत. नाही तर आजचे हिरवागार शेतशिवार येणाऱ्या वर्षी रणरणत्या उन्हात भाजून निघेल व पुन्हा प्रकाश बुराई उपसा सिंचन योजनेची स्वप्ने पडू लागतील व हातचे सोडून पळत्याच्या मागे धावावे लागेल.