शहरासह जिल्ह्यात गुंडगिरीचे प्रमाण काही कमी नाही़ शहरातच नव्हेतर जिल्ह्यात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटना, घरफोडी, रस्तालुटीच्या घटना वाढल्या आहेत. त्याचाही छडा लावून चोरट्यांना जेरबंद करण्याची गरज आहे. स्थानिक पोलिसांनी आपापल्या भागात गस्त घालण्याच्या प्रमाणात वाढ करण्याची आवश्यकता आहे़ त्याचे प्रमाण रात्रीच्या वेळेस सर्वाधिक असायला हवे़ चोरी अथवा घरफोडीच्या घटनेतील संबंधित संशयितांवर पोलिसांचा कटाक्ष हवा़ त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा चोऱ्या अथवा घरफोड्या होत असतील तर त्यांच्यावर कायमस्वरूपी वचक निर्माण करायला हवा़ पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी या बाबतीतील जिल्हास्तरीय आढावा घेऊन संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे़ नागरिकांनासुध्दा सुरक्षिततेसाठी प्रबोधन कशा पध्दतीने होईल, याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे़ नागरीकांनीही स्वत:सह मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करायला हव्यात़
या आठवड्यात रस्ता लुटीच्या लागोपाठ तीन घटना घडल्यामुळे ही चिंतेची बाब ठरू पाहत आहे़ लुटीचे गुन्हेही दाखल झाले आहेत़ पण, तपासाचे काय? पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिलेले आहे़ पोलिसांनी आता आपला धाक कायम ठेवल्यास गुन्हेगारीच्या प्रमाणात निश्चित घट होईल़ त्यासाठी ‘खाकीचा धाक’ कायम असायला हवा, एवढेच!