शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST

अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबतचे निवेदन शिरधाणे, खंडलाय, बांबुर्ले, भदाणे या भागातील शेतकऱ्यांनी आमदार कुणाल पाटील यांना ...

अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबतचे निवेदन शिरधाणे, खंडलाय, बांबुर्ले, भदाणे या भागातील शेतकऱ्यांनी आमदार कुणाल पाटील यांना दिले. त्यामुळे जिल्हाधिकारी संजय यादव तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आ. पाटील यांनी सांगितले की, अक्कलपाडा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या डाव्या कालव्यातील सिंचन क्षेत्र परिसरात भदाणे, खंडलाय, बांबुर्ले, शिरधाणे, नवलाने चिंचवार, मेहेरगाव, कावठी खेडे, वार, निमडाळे, गोंदूर ही गावे येतात. मात्र मे आणि जून महिन्यात या गावांच्या शेतातील विहिरींतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी व मशागतीसाठीही पाण्याची गरज भासते, मात्र या भागातील विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने कापूस लागवडीसह खरीप हंगामाची पूर्वतयारी खोळंबली त्यामुळे म्हणून अक्कलपाडा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या डाव्या कालव्यात पाणी सोडल्यास या भागातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतीसाठी मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते, म्हणून तातडीने डावा कालवामध्ये पाणी सोडण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.