शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

खरीपासाठी लगबग वाढली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:50 IST

बीटी कपाशीला प्राधान्य : बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकरी बाजारात

धुळे : जिल्ह्यात एकीकडे टंचाई तीव्र झालेली असताना दुसरीकडे आगामी खरीप हंगामासाठीची लगबग वाढत चालली आहे. आवंटनानुसार प्राप्त झालेल्या बीटी बियाण्याच्या किमतीची चौकशी, खरेदीसाठी बाजारात शेतक-यांची गर्दी होऊ लागली आहे. तसेच बीटीव्यतिरिक्त अन्य कपाशी व पिकांच्या वाणाचीही माहिती त्यांच्याकडून घेण्यात येत असल्याने सर्वांना पावसाचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात कपाशीची होणारी लागवड लक्षात घेऊन यावर्षी बीटी कपाशी बियाण्यांची ११ लाख ६३ हजार पाकिटे मंजूर झालेली असून त्यानुसार टप्प्याटप्प्याने पुरवठा यापूर्वी सुरू झाला आहे. सर्वच शेतकरी एकाच वेळी लागवड करत नाही. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहेत असे मोजके शेतकरी पूर्वहंगामी लागवड (धूळपेरणी) करतात. पण बहुतांश शेतकºयांकडे कोरडवाहू शेती असल्याने त्यांना पावसाची प्रतीक्षा करण्यावाचून गत्यंतर नसते. त्यामुळे मागणीएवढी पाकिटे वेळेत उपलब्ध होतील, असा विश्वास कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बीटी बियाणे २५ मेपूर्वी विक्री न करण्याच्या सूचना कृषीनिविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कंपन्यांकडून पुरवठा सुरू होताच शनिवारनंतर विक्री सुरू केली आहे. रविवारी बाजारपेठ बंद असतांनाही बियाणे घेण्यास आलेल्या शेतक-यांची गर्दी दिसून आली. कपाशीखालील क्षेत्र वाढणार  यंदा जिल्ह्यात खरिप हंगामांतर्गत एकूण ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित करण्यात आलेली आहे. त्यापैकी २ लाख ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होणे अपेक्षित आहे. जोरदार व नियमित पाऊस झाल्यास ही लागवड अडीच लाख हेक्टर क्षेत्राचा आकडा गाठेल, असा अंदाज आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी दरवर्षी कपाशीला प्राधान्य देत असल्याने दरवर्षी त्याखालील क्षेत्रात वाढ होत असून दुष्काळामुळे आहे. यंदा दुष्काळामुळे पूर्वहंगामी कपाशी लागवडीचे प्रमाण नगण्य राहील, अशी शक्यता आहे. बीटी कपाशी व्यतिरिक्त बाजरी, ज्वारी, तूर, मका आदी पिकांचे बियाणेही या महिन्याअखेरपर्यंत होईल, असे सांगण्यात आले. शेतकरी कृषीनिविष्ठा केंद्रांवर जाऊन अपेक्षित बियाणे उपलब्धता, त्याची किंमत याबाबत चौकशी करत आहेत. काही खरेदी करत आहेत. तर काही शेतकरी पाऊस झाल्यानंतर बियाणे खरेदी करतील, असे कृषीनिविष्ठा विक्रेत्यांनी सांगितले.कृत्रिम टंचाईचा संभव या संदर्भात बाजारात कानोसा घेतला असता बीटी कपाशीत राशी-२ ला शेतकºयांकडून मागणी होते. परंतु त्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे कृत्रिम टंचाई जाणवण्याचा संभव आहे. त्यामुळे कृषी विभागाने खबरदारी घेऊन संबंधित कंपन्यांना मागणीनुसार एकाचवेळी पुरवठा करण्याबाबत सूचना करावी, अशी मागणी होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व शेतकरी एकाचवेळी लागवड करत नसले तरी ते बियाणे खरेदी करून ठेवतात. 

टॅग्स :Dhuleधुळेagricultureशेती