शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष वाया गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:33 IST

गेल्या मार्चपासूनच कोरोनाचा फटका सर्वांना साेसावा लागतोय. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद राहिलेले नाही. गेल्यावर्षी या महाभयंकर संसर्गाचे पहिलेच वर्ष ...

गेल्या मार्चपासूनच कोरोनाचा फटका सर्वांना साेसावा लागतोय. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद राहिलेले नाही. गेल्यावर्षी या महाभयंकर संसर्गाचे पहिलेच वर्ष असल्याने, सुरक्षितता म्हणून राज्य सरकारने पहिली ते नववी, अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थी हिताला प्राधान्य दिल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी तो वाढतच गेला. अशाही स्थितीत दुसऱ्या सत्रानंतर टप्प्या -टप्प्याने शाळा सुरू झाल्या. मात्र पालकांमध्ये भीती असल्याने, अनेकांनी संमतिपत्र दिलेच नाही. शाळा पन्नास टक्के उपस्थितीने सुरू करण्याची परवानगी असली तरी अनेक विद्यार्थी शाळेची पायरी चढलेच नाही. शिवाय दिवसात फक्त चारच तासिका. त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी ‘गोंधळा’चा तास कमी नव्हता. पण दीर्घ कालावधीनंतर शाळा सुरू झाल्याचे समाधान होते. मात्र फेब्रुवारीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली. यात अनेक शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक बाधित झाले. त्यामुळे शाळा बंद झाली. दरम्यान, केवळ धुळे जिल्ह्यातच नाही तर राज्यातच कोराेनामुळे बिकट स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे राज्य शासानने पुन्हा एकदा विद्यार्थी हित लक्षात घेऊन सरसकट पहिली ते ११ वीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या. आता दोन वर्षांपासून विद्यार्थी परीक्षाविनाच पुढील वर्गात जात आहे. कोरोना हे संकट असले तरी विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गोडी कमी व्हायला नको याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शाळा नाही, परीक्षा नाही परंतु पुढील वर्गात प्रवेश यात कोण हुशार, कोणाची प्रगती असमाधानकारक हे समजेनासे झालेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गोडी टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची उन्हाळ्याची सुटी सत्कारणी लागेल असे नियोजन करायला पाहिजे.