शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

विरोधात बोलाल तर जेलची हवा खाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:39 IST

धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर अनेक ठिकाणी भाषणे झालीत. माझ्यासोबत असलेल्या मान्यवरांनीदेखील भाजप सरकारवर कडाडून टीका केली. मात्र मी त्यांना ...

धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर अनेक ठिकाणी भाषणे झालीत. माझ्यासोबत असलेल्या मान्यवरांनीदेखील भाजप सरकारवर कडाडून टीका केली. मात्र मी त्यांना आधीच सांगितले, बाबांनो टीका करा, मात्र मी करतोय म्हणून तुम्ही करू नका, भाजप सरकारविरोधात बोलाल तर तुम्हीदेखील भुजबळ होऊन जेलची हवा खाल, असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी जि.प. सदस्य किरण पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, एन.सी. पाटील, तेजस गोटे, डॉ. जितेंद्र ठाकूर आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

एकाही महिलेने माथा टेकला नाही.

गणेशोत्सवात पुण्यातील भिडे बागेतील गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठणासाठी शेकडो महिला जमल्या. महिलांनी शिकावे, पुढे जावे, याला विरोध नाही. मात्र त्याच भिडे बागेत काही अंतरावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुुले यांनी मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या ठिकाणी जाऊन एकाही महिलेला माथा टेकावा असं वाटू नये का? राष्ट्रवादी पक्ष सतत ओबीसी, दलित, वंचितांच्या हक्कासाठी संघर्षाची भूमिका घेत आहे. भाजपकडे सत्ता हातात असताना त्यांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिले नाही. मात्र सत्ता गेल्यावर ओबीसींच्या आरक्षणासाठी आक्रमक होतात. भाजप सरकारच्या वेळकाढूपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील ५६ हजार ओबीसींच्या जागा धोक्यात आल्या आहेत.

भाजप सरकार केवळ विकण्याचे काम करीत आहे

केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना अनेक विकासकामे केंद्रात व राज्यात झालीत. मात्र जे आमच्या कार्यकाळात झाले ते विकण्याचे काम या सरकारकडून केेले जात आहे. त्यामुळे आता सांगू नका आपण काय केले आहे. कारण सांगण्यासारखे काहीच शिल्लक नाही. सर्व काही या सरकारने विकून टाकले आहे, अशीही टीका राज्यमंत्री भुजबळ यांनी केली.

हो आहे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ एकाच जातीचा विचार केला नाही. त्यांनी सर्व जातींचा विचार करून भारतीय सविधान लिहिले. त्यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला डॉक्टर, वकील, इंजिनीअर तसेच विविध उच्च पदांवर काम करीत आहेत. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले. संविधानाने प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. मात्र असे असतानादेखील केवळ आम्ही सांगू तीच पूर्व दिशा. सत्तेवर बसण्यासाठी ईडीचा धाक दाखवून हे सरकार सत्तेवर बसले होते. या सरकारची हुकूमशाही कमी करण्यासाठी तिन्ही पक्ष मतभेद दूर ठेवून एकत्र आलेत.