शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

विरोधात बोलाल तर जेलची हवा खाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:39 IST

धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर अनेक ठिकाणी भाषणे झालीत. माझ्यासोबत असलेल्या मान्यवरांनीदेखील भाजप सरकारवर कडाडून टीका केली. मात्र मी त्यांना ...

धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर अनेक ठिकाणी भाषणे झालीत. माझ्यासोबत असलेल्या मान्यवरांनीदेखील भाजप सरकारवर कडाडून टीका केली. मात्र मी त्यांना आधीच सांगितले, बाबांनो टीका करा, मात्र मी करतोय म्हणून तुम्ही करू नका, भाजप सरकारविरोधात बोलाल तर तुम्हीदेखील भुजबळ होऊन जेलची हवा खाल, असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी जि.प. सदस्य किरण पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, एन.सी. पाटील, तेजस गोटे, डॉ. जितेंद्र ठाकूर आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

एकाही महिलेने माथा टेकला नाही.

गणेशोत्सवात पुण्यातील भिडे बागेतील गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठणासाठी शेकडो महिला जमल्या. महिलांनी शिकावे, पुढे जावे, याला विरोध नाही. मात्र त्याच भिडे बागेत काही अंतरावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुुले यांनी मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या ठिकाणी जाऊन एकाही महिलेला माथा टेकावा असं वाटू नये का? राष्ट्रवादी पक्ष सतत ओबीसी, दलित, वंचितांच्या हक्कासाठी संघर्षाची भूमिका घेत आहे. भाजपकडे सत्ता हातात असताना त्यांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिले नाही. मात्र सत्ता गेल्यावर ओबीसींच्या आरक्षणासाठी आक्रमक होतात. भाजप सरकारच्या वेळकाढूपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील ५६ हजार ओबीसींच्या जागा धोक्यात आल्या आहेत.

भाजप सरकार केवळ विकण्याचे काम करीत आहे

केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना अनेक विकासकामे केंद्रात व राज्यात झालीत. मात्र जे आमच्या कार्यकाळात झाले ते विकण्याचे काम या सरकारकडून केेले जात आहे. त्यामुळे आता सांगू नका आपण काय केले आहे. कारण सांगण्यासारखे काहीच शिल्लक नाही. सर्व काही या सरकारने विकून टाकले आहे, अशीही टीका राज्यमंत्री भुजबळ यांनी केली.

हो आहे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ एकाच जातीचा विचार केला नाही. त्यांनी सर्व जातींचा विचार करून भारतीय सविधान लिहिले. त्यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला डॉक्टर, वकील, इंजिनीअर तसेच विविध उच्च पदांवर काम करीत आहेत. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले. संविधानाने प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. मात्र असे असतानादेखील केवळ आम्ही सांगू तीच पूर्व दिशा. सत्तेवर बसण्यासाठी ईडीचा धाक दाखवून हे सरकार सत्तेवर बसले होते. या सरकारची हुकूमशाही कमी करण्यासाठी तिन्ही पक्ष मतभेद दूर ठेवून एकत्र आलेत.