शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पायी चालण्याची सवय मोडली, नको त्या वयात गुडघा-कंबरदुखी लागली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:42 IST

धुळे : पूर्वी वाहतुकीची साधने कमी होती, त्यामुळे बहुतांशजण गावात पायीच जायचे. मात्र, आता जवळपास सर्वांकडेच स्वयंचलित वाहने आली. ...

धुळे : पूर्वी वाहतुकीची साधने कमी होती, त्यामुळे बहुतांशजण गावात पायीच जायचे. मात्र, आता जवळपास सर्वांकडेच स्वयंचलित वाहने आली. त्यामुळे पायी चालण्याची सवय जवळपास सुटली. त्यामुळे वयाच्या ४०व्या वर्षीच गुडखा, कंबरदुखीच्या समस्यांना अनेकांना तोंड द्यावे लागत आहे.

हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते. नियमित चालण्याने दीर्घायुष्य लाभत असते. तसेच रक्तदाबही नियंत्रित राहू शकतो. नियमित चालण्याने वजन नियंत्रित राहते. मनाच्या एकाग्रतेसाठी, चिंतनासाठी चालणे हा एक चांगला व्यायाम आहे. सकाळी चालण्यामुळे हवेतील शुद्ध ॲाक्सिजनचा पुरवठा शरीराला होत असतो.

या कारणासाठी होतेय चालणे

ज्येष्ठ - व्यायाम म्हणून, प्रकृती चांगली राहावी यासाठी सकाळ-संध्याकाळ चालतात.

महिला - किराणा दुकान, भाजी बाजारापर्यंत पायी जातात.

पुरुष - रात्री जेवण झाल्यावर शतपावली करतात.

तरुणाई - गल्लीतल्या गल्लीत पायी फिरतात.

या कारणासाठी होतेय चालणे

आजचा काळ अतिशय गतिमान झालेला आहे. प्रत्येकाला आपले ध्येय पूर्ण करण्याचा ध्यास लागलेला आहे. अनेकांनी वाहनांचा वापर सुरू केला आहे. चालणे जवळपास बंदच झालेले आहे. स्वयंचलित वाहनांचा वापर वाढला. कार्यालयातही बसून काम केल्याने हाडांचे आजार वाढू लागले.

ज्यांना पायी चालणे शक्य नाही त्यांच्यासाठी

वयाची ६५ वर्षे ओलांडली की अनेकांना चालण्याचा त्रास होत असतो. ज्यांना पायी चालणे शक्य नाही, त्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम केला पाहिजे. हातापायाची हालचाल सारखी ठेवली पाहिजे. योगासने केल्यास त्याचाही फायदा होऊ शकतो.