शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये निराधारांना मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 22:07 IST

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अडीच महिन्यासाठी जिल्हा लॉकडाऊन केला होतो़ अशा अडचणीच्या काळात उद्योग, ...

ठळक मुद्देकार्यालयात एक खिडकी योजनाशहरातील अडीच हजार लाभार्थ्यांचे खाते बॅकेकडे वर्ग शहरातील अडीच हजार लाभार्थ्यांचे खाते बॅकेकडे वर्ग आवश्यक कागदपत्रे आणि राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे गरजेचे

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अडीच महिन्यासाठी जिल्हा लॉकडाऊन केला होतो़ अशा अडचणीच्या काळात उद्योग, व्यवसाय बंद असल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागू नये, योजनेच्या कार्यालयामार्फेत लाभार्थ्यांच्या बॅक खात्यात अनुदानाची रक्कम दरमहिन्याला वर्ग करण्यात येत आली़ २०१९ मध्ये शासनाने घेतलेला आॅनलाईन प्रणालीचा निर्णय लॉकडाऊन काळात महत्वकांशी ठरला असे मत संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार सुचीता चव्हाण यांनी लोकमत शी बोलतांना सांगितले़प्रश्न: शहरातील लाभार्थ्यांना किती योजनांचा लाभ दिला जातो?उत्तर: संजय गांधी योजना कार्यालया मार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग योजना योजना अशा पाच योजनांचा लाभ दिला जातो़प्रश्न: बॅकेकडे आतापर्यत किती खाते वर्ग करण्यात आले आहेत ?उत्तर: शासन योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम पोस्टाच्या खात्यात वर्ग केली जात होती़ मात्र पारदर्शकपणे लाभ मिळावा़ यासाठी आॅनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली आहे़ त्यानुसार शहरातील अडीच हजार लाभार्थ्यांचे खाते बॅकेकडे वर्ग करण्यात आलेले आहेत़प्रश्न: शहरात किती लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो?उत्तर: दिव्यांग, विधवा, घटस्पोटीत, ज्येष्ठ नागरिक अशा लाभार्थ्यांना ६०० ते १ हजार रूपयापर्यंत लाभ दिला जातो़ योजना सुरू झाल्यापासून शहरात या योजनेचे ११ हजार महिला व पुरूष लाभार्थी आहेत़ या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दर महिन्याला बॅकेद्वारे अनुदानाची रक्कम वर्ग केली जाते़प्रश्न: लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी काय प्रयत्न केलेउत्तर: सर्वसामान्य व्यक्तीपर्यत पोहचविण्यासाठी शासनाने २०१९ पासून पाचही योजना आॅनलाइन केल्या आहेत़ त्यामुळे लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी कुणाची मदत घ्यावी लागत नाही़ आॅनलाईन फॉर्म भरल्यानंतर मिळालेले टोकनव्दारे कार्यालयात तपास करून निश्चित योजनेचा लाभ मिळू शकतो़महा-ई सेवा केंद्रात सुविधा उपलब्धशासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना गैरसोय होऊ नये तसेच सहरित्या लाभ मिळावा़ याहेतून आपले सरकार ई सेवा केंद्रामार्फेत लाभार्थ्यांना योजनेसाठी अर्ज करता येतो़ त्यानंतर चौकशी होऊन लाभ दिला जातो़कार्यालयात एक खिडकी योजनाआॅनलाईन अर्ज भरल्यानंतर लाभार्थ्यांना टोकन क्रमाकं दिला जातो़ त्याद्वारे लाभार्थी कार्यालयात येवून आपल्या अर्जाची खात्री करून शकतो़ लॉकडाऊन काळात काही प्रकरणे प्रलंबित आहेत़ त्यासाठी लाभार्थी कार्यालयात येवून पाठपुरावा करीत आहे़ लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शहर तहसील कार्यालयात एक खिडकी चौकशीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे़बॅक खाते गरजेचेयोजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी मध्यस्थांशी व्यवहार करण्याची गरज नाही़ आवश्यक कागदपत्रे आणि राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे गरजेचे आहे़