शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

वाढलेली गर्दी तिसऱ्या लाटेला निमंत्रण तर देणार नाही ना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST

धुळे - जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट जून महिन्यात उतरंडीला लागली आहे. गेल्या २० दिवसात आढळलेल्या बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या ...

धुळे - जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट जून महिन्यात उतरंडीला लागली आहे. गेल्या २० दिवसात आढळलेल्या बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच केवळ तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर ठिकठिकाणी होत असलेली गर्दी तिसऱ्या लाटेला निमंत्रण तर देणार नाही ना ? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात येण्याच्या बाबतीत मे महिना आतापर्यंत तरी दिलासादायक ठरला आहे. १ ते २० जून या कालावधीत जिल्ह्यात २९३ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या मात्र अधिक आहे. गेल्या २० दिवसात ९३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मार्च व एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. मात्र १५ मे नंतर बाधित रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली होती. जून महिन्यात तर लाट पूर्णपणे उतरंडीला लागली आहे.

३१ मे रोजी होते ६४७ सक्रिय रुग्ण -

३१ मे रोजी ६४७ सक्रिय रुग्ण होते. १ ते २० जून या कालावधीत दैनंदिन बाधित रुग्णांची संख्या घसरल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. सध्या केवळ ९९ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच ३१ मे पर्यंत जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ६६५ इतकी होती. मागील २० दिवसात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात स्थान कायम -

निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्य शासनाने पाच टप्पे केले आहेत. प्रत्येक आठवड्यात त्याचा आढावा घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन निर्बंध कठोर किंवा शिथिल करण्याच्या सूचना आहे. पॉझिटिव्हिटी पाच टक्क्यांपेक्षा कमी व ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेल्या जिल्ह्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्याना नियमांमध्ये सर्वाधिक शिथिलता मिळाली आहे. अनलॉक नंतरही धुळ्याचा पॉझिटिव्हिटी रेट १ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने अनलॉक शिथिलतेच्या नियमांमध्ये पहिल्या टप्प्यावर स्थान कायम आहे.

वाढत्या गर्दीचे करायचे काय ?

निर्बंध शिथिल झाल्यानंतर बाजारपेठेत व इतर ठिकाणीही गर्दी वाढली आहे. मास्कचा तर नागरिकांना विसरच पडला असून सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढणार तर नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे. प्रादुर्भाव कमी झाला असली तरी कोरोना विषाणूचा संसर्ग अजून पूर्णपणे थांबलेला नाही त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी व्यक्त केले आहे.

ग्राफ साठी -

जूनमध्ये कोरोनाचा ग्राफ घसरला

१ ते २० जून

पॉझिटिव्ह रुग्ण - २९३

बरे झालेले - ९३७

मृत्यू - ३

सक्रिय रुग्ण - ९९