शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

स्वातंत्र्यासाठी गांधींजींनी अहिंसा तत्त्वाचे आचरण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:41 IST

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग, युवक बिरादरी, भारत व झेड.बी. पाटील महाविद्यालय, धुळे ...

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग, युवक बिरादरी, भारत व झेड.बी. पाटील महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन व्याख्यानात डाॅ. गिरासे बोलत होते. अध्यक्षस्थानी पद्मश्री क्रांती शहा होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, झेड.बी. पाटील महाविद्यालय, विकास समिती चेअरमन प्रा. सुधीर पाटील, प्राचार्य डॉ. पी.एच. पवार, माजी उपप्राचार्या डॉ. शशिकला पवार, डॉ. सचिन नांद्रे, उपप्राचार्य प्रा. व्ही.एस. पवार, डॉ. डी.के. पाटील व डॉ. वर्षा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गिरासे पुढे म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि या सर्वांच्या बरोबरीने भगत सिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू अशा असंख्य क्रांतिवीरांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. १८५७ पासून १९४७ या कालखंडात स्वातंत्र्यलढ्यात अनेक चढ-उतार आले, अनेक क्रांतिवीरांनी बलिदान केले, नवनवीन नेतृत्व आले. परंतु १९४२ ते १९४७ पर्यंतचा कालखंड अधिक वेगवान होता. वर्तमान स्थितीत स्वातंत्र्य संग्रामातील राष्ट्रपुरुषांच्या त्यागाच्या व बलिदानाच्या इतिहासाची उजळणी युवक तसेच समाजासमोर होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

पद्मश्री क्रांती शहा म्हणाले की, महात्मा गांधीजींनी ‘छोडो भारत’ जनआंदोलनाद्वारे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण आज देशात वाढलेला भ्रष्टाचार व बेरोजगारी कमी करून स्वातंत्र्याचे रूपांतर सुराज्यात होण्यासाठी छोडो गरिबी, छोडो दारिद्रय, छोडो निराशा नारा देण्याची आवश्यकता आहे.

प्राचार्य डॉ. पी.एच. पवार सर यांनी अतिथीपर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी केले. सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत कसबे यांनी केले, तर डॉ. योगिता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रतीक शिंदे व रासेयो स्वयंसेवक अभिजित घुगे, गौतमी पवार, महेश भामरे, प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले.