शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

स्वातंत्र्यासाठी गांधींजींनी अहिंसा तत्त्वाचे आचरण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:41 IST

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग, युवक बिरादरी, भारत व झेड.बी. पाटील महाविद्यालय, धुळे ...

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग, युवक बिरादरी, भारत व झेड.बी. पाटील महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन व्याख्यानात डाॅ. गिरासे बोलत होते. अध्यक्षस्थानी पद्मश्री क्रांती शहा होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, झेड.बी. पाटील महाविद्यालय, विकास समिती चेअरमन प्रा. सुधीर पाटील, प्राचार्य डॉ. पी.एच. पवार, माजी उपप्राचार्या डॉ. शशिकला पवार, डॉ. सचिन नांद्रे, उपप्राचार्य प्रा. व्ही.एस. पवार, डॉ. डी.के. पाटील व डॉ. वर्षा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गिरासे पुढे म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि या सर्वांच्या बरोबरीने भगत सिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू अशा असंख्य क्रांतिवीरांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. १८५७ पासून १९४७ या कालखंडात स्वातंत्र्यलढ्यात अनेक चढ-उतार आले, अनेक क्रांतिवीरांनी बलिदान केले, नवनवीन नेतृत्व आले. परंतु १९४२ ते १९४७ पर्यंतचा कालखंड अधिक वेगवान होता. वर्तमान स्थितीत स्वातंत्र्य संग्रामातील राष्ट्रपुरुषांच्या त्यागाच्या व बलिदानाच्या इतिहासाची उजळणी युवक तसेच समाजासमोर होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

पद्मश्री क्रांती शहा म्हणाले की, महात्मा गांधीजींनी ‘छोडो भारत’ जनआंदोलनाद्वारे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण आज देशात वाढलेला भ्रष्टाचार व बेरोजगारी कमी करून स्वातंत्र्याचे रूपांतर सुराज्यात होण्यासाठी छोडो गरिबी, छोडो दारिद्रय, छोडो निराशा नारा देण्याची आवश्यकता आहे.

प्राचार्य डॉ. पी.एच. पवार सर यांनी अतिथीपर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी केले. सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत कसबे यांनी केले, तर डॉ. योगिता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रतीक शिंदे व रासेयो स्वयंसेवक अभिजित घुगे, गौतमी पवार, महेश भामरे, प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले.