शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

अखेर अक्कलपाडातून सोडले पांझरेत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:02 IST

टंचाईग्रस्त भागाला दिलासा : पाण्यासाठी ग्रामस्थांनी केला होता रास्तारोको

न्याहळोद : जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरुन पाटबंधारे विभागातर्फे साक्री तालुक्यातील अक्कलपाडा प्रकल्पातून बुधवारी दुपारी पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. यामुळे धुळे, शिंदखेडा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांपासून दुष्काळी परिस्थिती असून गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेर व न्याहळोद ग्रामपंचायतीने प्रशासनाला निवेदन देऊन अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती.दरम्यान, नेर येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. त्यावेळी ११ फेब्रुवारी रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले होते. मात्र, १३ तारीख उजाडली तरी पाणी सोडण्याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत होता.अखेर बुधवारी दुपारी पाटबंधारे विभागातर्फे अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. प्रशासनाने पाणी सोडण्याबाबत गोपनियता बाळगली होती. राजकीय नेत्यांच्या अनुपस्थितीत हे पाणी सोडण्यात आले.येत्या तीन दिवसात हे पाणी धुळ्यात पोहोचेल. सुमारे १२ ते १५ दिवसात पांझरा नदीच्या अखेरच्या मुडावद गावाला हे पाणी पोहोचणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली. यामुळे पुढील काळात धुळे व शिंदखेडा तालुक्यातील ९० तर अमळनेर तालुक्यातील १० अशा शंभर गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटण्यास मदत होणार आहे.दुष्काळाप्रती जिल्हाधिकारी उदासीन : शरद पाटील यांचा आरोपजिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांपासून गंभीर दुष्काळी परिस्थिती असून गावागावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. पाणी व चाऱ्याअभावी शेतकºयांनी जनावरे विक्रीला काढली असून जिल्हा प्रशासनाकडे जनावरांच्या विक्रीची नोंद नाही. अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा पात्रात पाणी सोडण्याची मागणी डिसेंबरपासून शेतकºयांनी नोंदविली. मात्र, जिल्हाधिकाºयांच्या आडमुठ्या धोरणामुळे पाणी सोडण्यास विलंब झाला असल्याचा आरोप माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी केला आहे. जिल्हा प्रशासन दुष्काळग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी कधी बाहेर पडणार, तसेच जिल्हाधिकारी कचेरीपासून उपोषण व आंदोलनकर्त्यांना २०० मीटर लांब जेलरोडवर थांबवून जनतेच्या तीव्र भावनांपासून किती दिवस पळवाट काढणार आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच जिल्हाधिकाºयांच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री व विरोधी पक्षनेत्यांकडे तक्रार करणार असल्याचेही प्रा.पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Dhuleधुळे