शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

भरारी पथकाद्वारे पोषण आहाराची तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:09 IST

मालपूर परिसर : शासन निर्णय, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही; आहाराचा दर्जा वाढविण्याची मागणी

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह शिंदखेडा तालुक्यातील ग्रामीण भागातील पोषण आहारासंदर्भात वाढलेल्या तक्रारी लक्षात घेता नवनियुक्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी भरारी पथकाच्या माध्यमातून तपासणी करुन शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराचा दर्जा सुधारावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.मध्यान्ह भोजन म्हणून प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार व दुष्काळी भाग म्हणून सध्या पुरक पोषण आहारांचे देखील सर्वत्र शिजवण वाटप होत असते. मात्र याचा दर्जा व पोषण आहार वाटपाच्या प्रत्यक्ष शाळेवरील पद्धती यांच्यात दिवसेंदिवस वाढत्या तक्रारी येत असल्याचे पालकवर्ग सांगतात. यासाठी खास भरारी पथकांची नियुक्ती करुन पोषण आहाराची तपासणी करावी, हा शासन निर्णय झालेला आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. ग्रामीण भागात यावर्षी ‘खिचडी’ कोणाकडे याचाच जास्त खल शाळा सुरू होण्याच्या प्रारंभी शाळेत होत असतो. यासाठी वरुन फिल्डींग लावल्याची देखील शिक्षकांमध्ये चर्चा होते. म्हणून विद्यार्थ्यांना आहाराचे कमी वाटप करणे, निकृष्ठ आहार मुलांना देणे, तांदुळ व धान्यादी माल याचा शाळेमध्ये उपलब्ध प्रत्यक्ष साठा व नोंदवहितील नोंदी यांच्यात तफावत, बाजारात विक्री, घरी घेवून जाणे आदींची सखोल चौकशी करावी, अशी पालक वर्गातून मागणी होत आहे.सध्या पुरक आहारांच्या नावाखाली तर शिक्षक बाजारातच हिंडतांना दिसून येतात. अध्यापन मुख्य हेतु बाजुला करुन ह्या उद्योगामुळे याचा गुणवत्तेवर परिणाम दिसून येत आहे आणि शिवाय वाटपांच्या चुकीच्या पद्धतीमुळे झुंडीच्या झुंडी एकत्र गर्दी करतात. परिणामी खाली पडलेला पोषण आहार तसेच निकृष्ठ खाण्यायोग्य नसलेला विद्यार्थ्यांनी फेकून दिलेल्या पोषण आहारामुळे गावातील वराहांचा शाळेत मुक्त संचार दिसून येतो. यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा सगळा बोजवारा उडालेला दृष्टीपथास पडतो.पुरक पोषण आहारांतर्गत मालपूर येथे अंडी व केळी दिली जात असल्याचे दिसून येते. मात्र चुकीच्या वाटप पद्धतीमुळे काही ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतोच असे नाही. म्हणून एकदा याची भरारी पथकाने तपासणी करुन दर्जा व वाटपाच्या पद्धती सुधाराव्या, अशी येथील पालकवर्गाची मागणी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे