धुळे :कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका शांततेच्या वातावरणात होतील असे प्रतिपादन झेड.बी.पाटील महाविद्यालय विकास समिती चेअरमन प्रा.सुधीर पाटील यांनी केले. विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट धुळे संचालित झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने पाटील महाविद्यालयात विद्यार्थी परिषद निवडणूक एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. त्यावेळी प्रा. सुधीर पाटील अध्यक्षपदावरून बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ.पी. एच.पवार, प्राचार्य डॉ.पी.पी. छाजेड तर सभागृहात धुळे जिल्हयातील महाविद्यालयांचे प्राचार्य व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.कार्यशाळेत विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे यांनी आचारसंहिता व उमेदवार पात्रता याविषयी तर कायदा अधिकारी डॉ.एस. आर. भादलीकर यांनी निवडणूक कायदा विषयक मार्गदर्शन केले. जनसंपर्क अधिकारी सुनिल पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रा.सुधीर पाटील यांनी चांगल्या वातावरणात निवडणुका होतील असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.पी.एच.पवार यांनी, सूत्रसंचालन प्रा.डॉ.योगिता पाटील यांनी केले. यावेळी निवडणूक अधिकारी प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, प्रा.डॉ.विलास जाधव, प्रा. डॉ. आर.डी.शेलार, प्रा. डॉ. टी.जे.पाटील, प्रा. डॉ.पी.एस.गिरासे, प्रा. डॉ.एस. एच. खलाणे, प्रा.नितीन वाळके, प्रा. जितेंद्र पाटील, प्रा.पूनम देवरे, प्रा. मनोज बच्छाव, प्रा. डॉ.स्वप्निल पाडवी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.
निवडणुका शांततेच्या वातावरणात होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:34 IST