तेथून परतलेल्या सुमारे ४५० कर्मचारी कोरोनासह वेगवेगळ्या आजाराने बाधित झाले होते़ तर ५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले़ कोरोनाचा काळ सुरु झाल्यानंतर मुंबई येथे सेवा देण्यासाठी राज्य शासनाकडून आदेश पारीत झाल्यामुळे धुळे विभागातून वाहक आणि चालकांना सेवा देण्यासाठी पाठविण्यात आले़ त्यात ४ हजार ५०० वाहक आणि तितकेच चालक यांनी आपली सेवा दिली़ याशिवाय १ ऑक्टोबरपासून मुंबई येथील बेस्टसाठी धुळे विभागातून १०० बसेस पाठविण्यात आलेल्या होत्या़ गत २५ आठवड्यापासूनची ही स्थिती आहे़ जानेवारी महिन्यापासून यात थोडा बदल करण्यात आला असून पाठविण्यात आलेल्या १०० बसेसपैकी ५० बसेस या परत बोलावून घेण्यात आलेल्या आहेत़
परत आल्यानंतर अनेकांना झाला त्रास
मुंबई येथे सेवा दिल्यानंतर वेगवेगळ्या आजाराने सुमारे ४०० ते ४५० कर्मचारी आजारी पडल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले़ त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ तर काही जण बरे होऊन पुन्हा आपल्या कामाला देखील लागले आहेत़ शिवाय, पाच जण असे निघाले होते की त्यांना कोरोनाची बाधा झाली होती़ आता त्यांचीही प्रकृती ठिक आहे़
विभागाच्या आदेशान्वये आम्हाला मुंबई येथील नागरिकांसाठी पाठविण्यात आले होते़ तेथे योग्य ती सेवा देऊन परतलो आहोत़ आम्ही आमच्या जीवाची काळजी घेतली होती़ शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन देखील केले असल्याचे एका चालकाने सांगितले़
विभागाच्या आदेशामुळे आम्हाला मुंबईत जाण्याची वेळ आली़ बसमध्ये नागरीकांशी सर्वाधिक संबंध येत असल्यामुळे आम्ही काळजी घेतली होती़ तरी देखील तब्येत बिघडली़ औषधोपचार घेण्यात आला असून आता प्रकृती बरी आहे़ असे एका वाहकाने सांगितले़
मुंबईला बेस्टची सेवा देण्यासाठी वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्यांना पाठवू नये असे आदेश आहे. मात्र त्या आदेशाकडे दुर्लक्ष कडून ५० वर्षांपुढील चालक-वाहकांना पाठविले जात आहे. इतर विभाग सोडून धुळे विभागातील चालक-वाहकांनाच पाठविले जाते. हा अन्याय आहे. मुंबईहून आलेल्या चालक-वाहकांची तपासणी होत नाही, ती झाली पाहिजे.
-दीपक पांडव, विभागीय अध्यक्ष, कामगार संघटना धुळे.