शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
3
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
4
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
5
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
6
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
7
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
8
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
9
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
10
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
11
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
12
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
13
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
14
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
15
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
16
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
17
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
18
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
19
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
20
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता

भारनियमनामुळे पिकांना पाणी देण्यास अडचणी

By admin | Updated: January 11, 2017 00:02 IST

कापडणेसह परिसरातील शेतक:यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, दादर, मका, ज्वारी, भुईमूग, भाजीपाला आदी पीक लागवडीला फाटा दिला आहे.

कापडणे : धुळे तालुक्यातील कापडणेसह परिसरातील शेतक:यांनी  रब्बी हंगामातील गहू, हरभरा, दादर, मका, ज्वारी, भुईमूग, भाजीपाला आदी पीक लागवडीला फाटा दिला आहे.  सद्य:स्थितीत या भागात भारनियमन सुरू आहे. परिणामी, येथील शेतक:यांना पिकांना पाणी देण्यास अडचणी येत असून भारनियमन त्वरित रद्द करावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, पांढ:या कांद्याच्या लागवडीवर शेतक:यांचा यंदा अधिक कल दिसला.भारनियमनाचा त्रासमहावितरण कंपनीतर्फे कापडणेसह परिसरात आता भारनियमन सुरू झाले आहे. एका आठवडय़ात सकाळी 10 ते सायंकाळी 8 तर दुस:या आठवडय़ात संपूर्ण दिवसभर वीज बंद असते. त्यामुळे दिवसभर वीज बंद असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. कृषी पंपही बंद भारनियमनामुळे बंद असतात. त्यामुळे कापडणे भागात सुरू असलेले भारनियमन त्वरित बंद करावे, अशी मागणी येथील शेतक:यांनी केली आहे. कापडणे येथील 1200 ते 1500 एकर जमिनीवर कांद्याची लागवड केली जाते. खरीप हंगामातही येथील शेतक:यांनी मोठय़ा आशेने कांदा लागवड केली होती. परंतु, त्यांना हाती तुटपुंजे पैसे मिळाले होते. यंदा परिसरातील जयवंत यशवंत बोरसे, संभाजी रघुनाथ बोरसे, शिवाजी शंकर बोरसे, भीमराव महादू बोरसे, देवीदास गंगाराम खलाणे, अरुण पुंडलिक पाटील, अरुण परशुराम पाटील, विजय हिंमत पाटील, विश्वास आत्माराम देसले, सुरेश भीमराव बोरसे, उज्ज्वल बोरसे, नथ्थू जयराम माळी, राजेंद्र रमेश माळी, विलास आसाराम माळी यांच्यासह काही शेतक:यांनी मोठय़ा हिंमतीने पुन्हा कांदा लागवडीस प्रारंभ केला आहे.  त्यात येथील परिसरात सद्य:स्थितीत विहिरी व कूपनलिकांचे पाणी दिवसेंदिवस तळ गाठत आहे, त्यात शेतक:यांनी कांदा लागवडीचा जो निर्णय घेतला, तो किती योग्य आहे? हे येणारा काळच ठरवणार आहे.पांढ:या कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर गेल्या वर्षी रांगडा कांद्यापेक्षा सफेद कांद्याच्या उत्पादनातून येथील शेतक:यांना चांगले उत्पादन मिळाले होते. त्यामुळे शेतक:यांनी पुन्हा कांदा लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादनातून आता चांगले उत्पादन मिळाले तर पुढे येणा:या खरीप हंगामात शेतक:यांना फायदा होणार आहे, या विचाराने शेतक:यांनी कांदा लागवड केली आहे.  कांद्याने रडवले होते गेल्या हंगामात येथील शेतक:यांनी रांगडा कांद्याची लागवड मोठय़ाप्रमाणावर केली होती. त्यासाठी सावकार, पतपेढय़ा, वि.का. सोसायटय़ा व इतर बॅँकांतून कर्ज काढले होते. परंतु, कांद्याला केवळ 5 ते 10 रुपये किलो याप्रमाणे भाव मिळाल्याने शेतक:यांनी हा कांदा चाळीत साठवून ठेवला होता. परंतु, चाळीतील कांदाही सडून गेला. त्यामुळे शेतक:यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली. कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर यंदा शेतक:यांनी पांढ:या कांद्याची लागवड केली आहे.