शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

रिक्त पदे भरण्याबाबत शैक्षणिक संस्थांपुढे अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2017 00:15 IST

अतिरिक्त शिक्षकांचे 100 टक्के समायोजन न झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये नवीन शिक्षक व कर्मचा:यांच्या भरतीला ब्रेक लागला आहे.

धुळे : अतिरिक्त शिक्षकांचे 100 टक्के समायोजन न झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये नवीन शिक्षक व कर्मचा:यांच्या भरतीला ब्रेक लागला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण न झाल्याने वैयक्तिक मान्यतेसाठी प्राप्त झालेले प्रस्ताव रद्द करण्याचे आदेश  माध्यमिक शिक्षणाधिका:यांना राज्यस्तरावरून देण्यात आले आहे.रिक्त जागांची स्थितीजिल्ह्यामध्ये सद्य:स्थितीत 282 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा भरण्याबाबत शिक्षण संस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत. या जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे, परंतु अतिरिक्त शिक्षक समायोजनासाठी शिक्षण विभागाकडून याला मान्यता दिली जात नाही. संस्थाचालकांकडून भरतीत्यामुळे ब:याच ठिकाणी संस्थाचालकांनी तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची भरती या रिक्त जागांवर केली आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात संस्थांनी नियुक्त केलेले शिक्षक यामुळे अतिरिक्त शिक्षकांना समावून घेण्यास संस्थाचालक टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.राज्यस्तरावरून आदेश    जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाल्याशिवाय खासगी संस्थेच्या अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेली पदे ही विषयाची गरज व आरक्षणाच्या संवर्गानुसार भरण्यास जाहिरात देण्यासाठी परवानगी देऊ नये, अशी तरतूद आहे. यासंदर्भात सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.पदे भरण्यास परवानगीराज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे भरण्याचा अधिकार संबंधित शैक्षणिक संस्थेस काही नियम व अटींवर देण्यात आला आहे. यासाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल करून परवानगी घेणे आवश्यक आहे.शासनाकडून पटपडताळणीशासनाने राबविलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेनंतर बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखविल्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे 100 टक्के समावेशन झाल्याशिवाय नवीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा:यांची भरती करण्यात येऊ नये असे शासनाकडून आदेश देण्यात आले होते. जोर्पयत समायोजन प्रक्रिया होत नाही तोर्पयत नवीन भरती करता येणार नाही. तसेच प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावरील अतिरिक्त शिक्षकांचे 100 टक्के समावेशन झाल्याचे प्रमाणपत्र  विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर केल्याशिवाय व शासन निर्णयातील समितीचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय शैक्षणिक संस्थांना रिक्त पदे भरता येणार नाही, अशाही सूचना नुकत्याच शिक्षण विभागाला दिल्या आहेत.जिल्ह्यातील 35 शिक्षकांचे समायोजन अजूनही बाकीमाध्यमिक विभागामध्ये एकूण 86 शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यापैकी आतार्पयत 51 शिक्षकांचे अंतिम समायोजन झाले आहे. अजूनही 35 शिक्षकांचे समायोजन बाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये रिक्त असणा:या शिक्षकांच्या जागा भरता येत नाहीत. नवीन जागा भरण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडे प्रस्ताव आले तरी शिक्षण विभागाकडून नवीन जागांसाठी प्रस्ताव स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये रिक्त जागांचा प्रश्न गंभीर झाला आहे.