शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

डाक सेवकांची टपाल कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 13:34 IST

बेमुदत संपात ८०० जणांचा सहभाग : ग्रामीण भागातील सेवा ठप्प; प्रलंबित मागण्या निकाली काढण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क

ठळक मुद्देकमलेश चंद्र कमेटी रिपोर्ट लागू करावा,ग्रामीण डाक सेवकांच्या कामाची वेळ आठ तास करावी. ग्रामीण डाक सेवकांना पेन्शन लागू करावी. ग्रामीण डाक सेवकांना दिलेले लक्ष पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांनी जबरदस्ती करू नये,सातवा वेतन आयोग लागू करावा.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : ग्रामीण डाक सेवकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील ८०० डाकसेवक बेमुदत संपावर उतरले आहेत. शुक्रवारी सकाळी डाकसेवकांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी शहरातील मुख्य पोस्ट आॅफिससमोर आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली. दरम्यान, या संपामुळे ग्रामीण भागातील डाक सेवा ठप्प झाली असून त्याचा फटका ग्रामस्थांना बसला आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटना १६ पासून बेमुदत संपावर उतरली आहे. अशा परिस्थितीत सरकार ग्रामीण डाक सेवकांच्या मागण्या सोडविण्यासाठी वेळकाढूपणा करीत आहे. यासंदर्भात सरकार दरबारी दोनदा बैठका झाल्या. परंतु, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.नोटीस देऊनही उपयोग नाही बेमुदत संपावर उतरण्यासाठी एक महिन्यांपूर्वी नोटीस देण्यात आली होती. तरीही सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आल्याचे ग्रामीण डाकसेवकांनी म्हटले आहे. घोषणाबाजीने दणाणला परिसर शहरातील मुख्य पोस्ट आॅफिस कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी ग्रामीण डाकसेवकांनी निदर्शने करीत प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटनेचे अध्यक्ष कॉ. एस. एल. बदामे, सचिव कॉ. एम. डी. अहिरे, आर. ई. देवरे, एन. एस. शेख, एल. यू. शिंदे, बी. बी. पालवे, आर. व्ही. खैरनार, जी. आय. खान, यू. डी. बोराडे आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील सेवा ठप्प ग्रामीण डाक सेवकांच्या संपामुळे ग्रामीण भागातील डाक सेवा ठप्प पडली आहे. स्पीड पोस्ट, मनी आॅर्डर, लाईट बिल, पत्र व महत्त्वपूर्ण कागदपत्रे पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही संघर्ष करीत आहोत. परंतु, प्रश्न सुटलेला नाही. त्यात आमचा सातव्या वेतन आयोगाचा विषयही लांबणीवर पडला आहे. यासह इतर मागण्याही प्रलंबित आहे. त्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत हा संप सुरूच ठेवणार आहे.     - एम. डी. अहिरे, सचिव,     आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना