शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

लुबाडणूक टाळण्यासाठी ग्राहकांनो सजग रहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:04 IST

अरुण देशपांडे यांची पत्रपरिषदेत माहिती : कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याचे विक्रेत्यांना निर्देश

ठळक मुद्दे२४ तास तक्रारी करण्यासाठी टोल फ्री क्रमांक अनेकदा चित्रपटगृहांमध्ये बाहेरून पाण्याची बाटली किंवा इतर खाण्याचे पदार्थ घेऊन दिले जात नाही. काही शाळांमध्येही मुलांच्या पालकांना वह्या, गणवेश हे शाळेतूनच घ्यावे, अशी सक्ती केली जाते. तसेच शासनाने ठरवून दिलेल्यप्लॅस्टीकचे तांदूळ सापडल्या प्रकरणी चौकशी सुरू... गेल्या काही दिवसात प्लॅस्टीकचे तांदूळ सापडल्याच्या घटना मुंबईमध्ये घडल्या आहेत. धुळ्यातही काही दिवसांपूर्वीच अशी घटना घडली होती. यासंदर्भात अरुण देशपांडे यांना विचारणा केली असता, त्यांनी यासंदर्भात चौकशी वैद्यकीय क्षेत्रातील लूट थांबविण्यासाठी लवकरच येणार कायदा... सद्य:स्थितीत वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांची लूट केल्याचे प्रकार घडत आहेत. ती थांबविण्यासाठी लवकरच ‘क्लिनीकल एस्टॅबिलीशमेंट अ‍ॅक्ट’ येणार आहे. हा कायदा आल्यानंतर रुग्णांची फसवणूक होण्याचे प्रकार था

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : ग्राहकांची अडवणूक करून त्यांची लूटमार करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी सरकारचे पारदर्शक धोरण आहे. मात्र, तरीही आभाळ इतके फाटले आहे की त्याला ठिगळ लावणार तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित होतो. तरीही ग्राहकांनी सजग राहून लुबाडणूक करणाºयांच्या विरोधात तक्रार द्यावी, असे आवाहन राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती व राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष  अरुण वसंतराव देशपांडे (मंत्रीस्तरीय) यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात शुक्रवारी दुपारी ही पत्रपरिषद झाली. देशपांडे पुढे म्हणाले, की पूर्वीच्या सरकारच्या काळात ग्राहकांच्या अनेक अडचणींकडे उदासिनतेने पाहिले जात होते. परंतु मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वात प्रथम ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून ‘राईट टू सर्व्हिस’ अ‍ॅक्ट लागू केला. याअंतर्गत अन्नधान्यांमध्ये होणारी भेसळ, मॉल, दुकानांमध्ये ग्राहकांची होणारी लूटमार व इतर ठिकाणी ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई झाली का नाही? याबाबत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीतर्फे पाठपुरावा केला जातो. तसेच ग्राहक हिताच्या दृष्टीनेही समितीतर्फे शासनाने नेमके काय धोरण ठरविले पाहिजे, याविषयी सूचित केले जाते.  यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय बोरूडे, साहाय्यक पुरवठा अधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार अमोल मोरे, अपर तहसीलदार ज्योती देवरे आदी उपस्थित होते. प्रशासनाची भूमिका महत्त्वाची!ग्राहक हिताच्या दृष्टीने शासनातर्फे जे काही निर्णय होतात, त्याविषयी माहिती प्रशासनातर्फे सर्वसामान्य नागरिकांना देणे गरजेचे आहे. शासन व ग्राहक यांच्यातील मधला दुवा म्हणजे प्रशासन होय. ग्राहकांना जागरूक करण्यासाठी प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही देशपांडे म्हणाले. ग्राहक जागृती कार्यक्रम राबविणार!ग्राहक हिताच्या दृष्टीने राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीतर्फे ग्राहक जागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या तरतुदींनुसार ग्राहकांना अपेक्षित असलेली सेवा देणे विक्रेत्यांचे कर्तव्य आहे. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.