शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

पाणी टंचाईमुळे कापडणे परिसरात भूईमूग पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2017 15:54 IST

उन्हामुळे विहिरी व कुपनलिका आटल्या; पिकाची वाढ खुंटल्याने शेतकरी त्रस्त

ऑनलाईन लोकमत
कापडणे,दि.27 - धुळे तालुक्यातील कापडणेसह परिसरात रब्बी हंगामातील उन्हाळी भूईमूग पिकाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. परंतु, उन्हामुळे येथील परिसरातील  विहिरी व कूपनलिका आटल्याने निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा भूईमूग पिकाला फटका बसला आहे. काही ठिकाणी या पिकांची वाढ देखील खुंटल्याचे चित्र दिसत असून त्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाला आहे. 
खर्च जास्त; उत्पादन कमी 
रब्बी हंगामात भूईमूगाच्या पिकांचा पेरा येथील ब:याच शेतक:यांनी केला होता. परंतु, बहुतांश शेतक:यांना या पिकातून मोठा तोटा सहन करावा लागत आहे. भूईमूग पिकाची पेरणी करण्यापूर्वी शेतक:यांना शेती मशागत करून घेतली. त्यानंतर तीन हजार रुपयांच्या रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या, 3500 रुपयांची भूईमूग शेंगा बियाणे, तीन हजार रुपये दोन वेळेच्या निंदणीची मजुरी, तसेच कोळपणी, खूरपणी, भूईमूग शेंगा काढणी यासाठी सुमारे एका शेतक:याला 17 ते 18 हजार रुपये खर्च आला. परंतु, त्या तुलनेत उत्पादन अगदी कमी निघाल्याने  हे पीक लागवड करण्यासाठी आलेला खर्चही निघत नसल्यामुळे येथील शेतकरी कमालिचा अडचणीत सापडला आहे. 
काही भागात शेंगाच लागल्या नाहीत 
कापडणे परिसरातील शेतकरी जिजाबराव नारायण पाटील या शेतक:याने त्याच्या शेतात सव्वा एकर जमिनीत 40 किलो बियाणे टाकले होते. चार महिने त्यांनी वेळेवर पिकाला पाणी दिले. त्यासाठी हजारो रुपये खर्च केला. परंतु, ऐन भूईमूग काढणीच्या वेळी पाणी टंचाई व वाढत्या तापमानामुळे त्यांच्या शेतातील भूईमूगाला शेंगा लागलेल्या नाहीत. 
 काही झाडांना शेंगा लागल्या परंतु, त्यांची संख्या दोन ते तीनच असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच भूईमूगाच्या पाल्याचीही वाढ खुंटल्यामुळे मोठा तोटा त्यांना सहन करावा लागत आहे.