शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
3
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
4
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
5
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
6
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
7
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
8
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
9
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
10
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
11
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
12
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
13
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
14
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
15
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
16
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
17
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
18
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
19
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
20
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात

पाणी टंचाईमुळे कापडणे परिसरात भूईमूग पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2017 15:54 IST

उन्हामुळे विहिरी व कुपनलिका आटल्या; पिकाची वाढ खुंटल्याने शेतकरी त्रस्त

ऑनलाईन लोकमत
कापडणे,दि.27 - धुळे तालुक्यातील कापडणेसह परिसरात रब्बी हंगामातील उन्हाळी भूईमूग पिकाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. परंतु, उन्हामुळे येथील परिसरातील  विहिरी व कूपनलिका आटल्याने निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा भूईमूग पिकाला फटका बसला आहे. काही ठिकाणी या पिकांची वाढ देखील खुंटल्याचे चित्र दिसत असून त्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाला आहे. 
खर्च जास्त; उत्पादन कमी 
रब्बी हंगामात भूईमूगाच्या पिकांचा पेरा येथील ब:याच शेतक:यांनी केला होता. परंतु, बहुतांश शेतक:यांना या पिकातून मोठा तोटा सहन करावा लागत आहे. भूईमूग पिकाची पेरणी करण्यापूर्वी शेतक:यांना शेती मशागत करून घेतली. त्यानंतर तीन हजार रुपयांच्या रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या, 3500 रुपयांची भूईमूग शेंगा बियाणे, तीन हजार रुपये दोन वेळेच्या निंदणीची मजुरी, तसेच कोळपणी, खूरपणी, भूईमूग शेंगा काढणी यासाठी सुमारे एका शेतक:याला 17 ते 18 हजार रुपये खर्च आला. परंतु, त्या तुलनेत उत्पादन अगदी कमी निघाल्याने  हे पीक लागवड करण्यासाठी आलेला खर्चही निघत नसल्यामुळे येथील शेतकरी कमालिचा अडचणीत सापडला आहे. 
काही भागात शेंगाच लागल्या नाहीत 
कापडणे परिसरातील शेतकरी जिजाबराव नारायण पाटील या शेतक:याने त्याच्या शेतात सव्वा एकर जमिनीत 40 किलो बियाणे टाकले होते. चार महिने त्यांनी वेळेवर पिकाला पाणी दिले. त्यासाठी हजारो रुपये खर्च केला. परंतु, ऐन भूईमूग काढणीच्या वेळी पाणी टंचाई व वाढत्या तापमानामुळे त्यांच्या शेतातील भूईमूगाला शेंगा लागलेल्या नाहीत. 
 काही झाडांना शेंगा लागल्या परंतु, त्यांची संख्या दोन ते तीनच असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच भूईमूगाच्या पाल्याचीही वाढ खुंटल्यामुळे मोठा तोटा त्यांना सहन करावा लागत आहे.