शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मातीमोल भावाने कपाशीची केली जातेय मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:42 IST

तालुक्यातील एका गावात मण दोन मण कापूस ९ हजार ५१ रुपयांनी खरेदी करुन एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच केली. मुहूर्ताच्या ...

तालुक्यातील एका गावात मण दोन मण कापूस ९ हजार ५१ रुपयांनी खरेदी करुन एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच केली. मुहूर्ताच्या नावावर एवढा भाव फोडल्यानंतर किमान आपला कापूस सात हजार रुपये क्विंटल तरी जाईल अशी येथील शेतकऱ्यांना आशा होती. मात्र ती आशा फोल ठरली. मालपूर ता. शिंदखेडा येथे घाऊक व्यापारी हे सध्या चार साडेचार हजार रुपये या कापसाला किंमत देत आहे. तर उत्तम प्रतीच्या कापसाला पाच हजार रुपये क्विंटल दर दिला जात आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून किमान सात हजार रुपये कापसाला दर मिळावा, अशी मागणी केली आहे. कारण उत्पन्नात प्रचंड घट झाली असून सर्वच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. यामुळे समतोल तरी साधला जाईल व लावलेले भागभांडवल निघेल.

मालपूर येथे नऊ लहान मोठे कापूस खरेदी करणारे व्यापारी असून दरवर्षी मुहूर्ताच्या दिवशी दिवसभर जो भाव ठरवला जात होता, तो भाव हे व्यापारी देत होते. मात्र या वर्षी या परंपरेला फाटा दिला गेल्याने येथील शेतकऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. यामुळे ओला कापूस सुकवून साठवून ठेवून चांगला भाव मिळेल, या प्रतीक्षेत येथील शेतकरी आहे. किमान सात हजार रुपये भाव मिळावा, अशी मागणी केली आहे.

चौकट..... खाजगी कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा वजनकाटा सदोष आहे की नाही, तो पासिंग केलेला आहे का तसेच पासिंग केलेला वजनकाटाच वापरला जात आहे की नाही यावर शासन प्रशासनाने नजर ठेवावी. तसेच वेळोवेळी तपासणी करावी. मालपूरसह संपूर्ण ग्रामीण भागात गावोगावी कापसाची खरेदी विक्री ही गावातच होत असते. यामुळे वजनात शेतकरी नाडला जात असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याकडे या विभागाने लक्ष घालावे.

फोटो :- मालपूर तालुका शिंदखेडा येथे वाळत टाकलेला कापूस.