शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

काँग्रेस - राष्टÑवादीची अस्तित्वाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 13:36 IST

जि.प. व पं.स.निवडणूक : अमरिशभाई, दहितेंच्या भाजप प्रवेशामुळे निवडणुकीतील राजकीय गणित बदलतील

धुळे : धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ७ जानेवारी २०२० रोजी ५६ गट व ११२ गणांसाठी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळेस काँग्रेसचे माजी आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह जिल्हा परिषदेतील मातब्बर नेते भाजपमध्ये गेल्याने यंदाची जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय गणित बदलतील. भाजपचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेस - राष्टÑवादीसाठी जिल्हा परिषदेतील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.धुळे जिल्हा परिषदेवर स्थापनेपासूनच मधले अडीच वर्ष वगळता सतत काँग्रेसची अबाधित सत्ता राहिली आहे. गेल्या निवडणुकीसुद्धा काँग्रेस - राष्टÑवादीचीच सत्ता जिल्हा परिषदेवर होती. काँग्रेसचे शिवाजीराव दहिते हे अध्यक्ष होते.अमरिशभाईचा भाजप प्रवेशविधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे माजी आमदार व नेते अमरिशभाई पटेल यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, शिंदखेड्यात डॉ.हेमंत देशमुख गटातील मातब्बर नेतेमंडळीने भाजपमध्ये प्रवेश केला. ृतर काँग्रेस आघाडीतील मित्रपक्ष राष्टÑवादीचे प्रमुख नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनीसुद्धा राष्टÑवादी पक्षाचा राजीनामा दिल्याने पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.दोन्ही पक्षाची अशी बिकट परिस्थिती असतांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे. ही निवडणूक म्हणजे काँग्रेस - राष्टÑवादी पक्षासाठी आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी लढावी लागणार आहे. काँग्रेसकडे आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष शाम सनेर हे दोन नेते प्रमुख आहेत. राष्टÑवादीत जिल्हाध्यक्ष किरण शिंदे आणि माजी जि.प.सभापती किरण पाटील, माजी अध्यक्ष संदीप बेडसे आहेत. या सर्वच नेत्यांना आपली प्रतिष्ठापणाला लावून ही निवडणूक लढावी लागणार आहे.या निवडणुकीत शिवसेना ही आघाडीसोबत राहण्याची शक्यता आहे. परंतू गेल्या जिल्हा परिषदेतील निकाल पाहता शिवसेना आघाडीसोबत गेलीतरी फारसा फरक पडणार नाही, असे आजतरी वाटते. एकूणच काँग्रेस - राष्टÑवादी आणि शिवसेना सोबत आल्यास महाशिवआघाडीतील नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.भाजपचे वर्चस्व वाढलेदुसरीकडे भाजपचे राजकीय वर्चस्व निश्चित वाढले आहे. भाजपकडे माजी मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्यासह नव्याने दाखल झालेला माजी आमदार अमरिशभाई पटेल यांचा अँकर गट यामुळे आजतरी चारही तालुक्यात भाजपचे वर्चस्व आघाडीपेक्षा जास्त दिसते. त्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील राजकीय गणित बदलतील, असे आजतरी दिसते.त्यात आता जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण निघाले. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. अनेक दिग्गज या निवडणुकीत आपले नशिब अजमाविण्यासाठी रिंगणात उतरतील. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे